लातूर : प्रतिनिधी
राज्यभरात व खासकरून मराठवाड्यात नैसर्गिक आपत्तीने अपरिमित नुकसान झाले असून अनेक शेतक-यांची हाता तोंडाशी आलेली उभी पिके जमिनिसह वाहून गेलेली आहेत. शेतकरी उध्वस्त झालेला आहे. अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडलेले असून अनेक शेतक-यांची जनावरेही मृत्युमुखी पडलेले आहेत. अनेक नागरिकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झाला असून चिंताग्रस्त बनला आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करत शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह सातबारा कोरा करावा अशी मागणी मनसे नेते तथा माजी गृहराज्य मंत्री बाहा नांदगावकर यांनी लातूर येीिल आयोजित कार्यक्रमात बोलताना केली.
मराठवाड्यातील, लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खते आणि बी-बियाण्याचे वाटप मनसे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर, पाणी दूत प्रदेश सरचिटणीस डॉ. मनोज चव्हाण, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर बोलत होते.
पुढ बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, सरकारने एनडीआर एफ किंवा इतर कोणत्याही अटी न लावता शेतक-यांचे सरसकट पंचनामे करून सणासुदीच्या तोंडावर शेतक-यांच्या खात्यामध्ये त्वरित पैसे जमा करणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता २०२२ ला महाराष्ट्र सरकारने हेक्टरी १३५०० रुपयाची मदत जाहीर केली होती आणि मग आता आठ हजार पाचशे रुपये कोणत्या हिशोबाने दिले याचा प्रश्न पडलेला आहे. वास्तविक १३५०० असतील किंवा ८५०० असतील हे खूप तुटपुंजी मदत आहे. शेतक-याला एका हेक्टर मध्ये पाळी, पेरणी, नांगरणी फवारणी जर करायचं म्हणलं तर किमान एक लाख रुपये खर्च येतो. फळबागा वाल्यांचा खर्च याच्यापेक्षा चौपट असतो, बागायतीचा खर्च या पेक्षा दुप्पट असतो तरी देखील सरकार शेतक-यांकडे दुर्लक्ष करत आहे.
यावेळी लातूर जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिह भिकाणे, शिवकुमार नागराळे, भागवत शिंदे, मनोज अभंगे, किरण चव्हाण, भागवत कांदे, पांडुरंग कदम, सचिन सिरसाठ, रवी सूर्यवंशी, संग्राम रोडगे, सचिन बिराजदार, सोमनाथ कलशेट्टी, कैलाश धुळगुंडे, बालाजी धोत्रे, अनिल पांढरे, योगेश सूर्यवंशी, बालाजी कांबळे यांच्यासह जिल्ह्यातून शेकडो शेतकरी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

