काश्मिरातील हस्तकला उद्योगाचे भवितव्य संकटात!

श्रीनगर : वृत्तसंस्था
काश्मिरी हस्तकला त्यांच्या कलात्मक कामासाठी आणि भव्यतेसाठी जगभर ओळखली जाते. मात्र, पहलगामच्या हल्ल्यानंतर काश्मीरच्या या पारंपरिक व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. काश्मिरी शाली आणि गालिचे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. पहलगाम हल्ल्यापासून काश्मिरात भीतीचे सावट आहे. याचा राज्यातील हँडलूम उद्योगावर विपरित परिणाम दिसून येत असून, तब्बल एक ते दीड हजार कोटीची उलाढाल असलेल्या हस्तकला उद्योगाचे भविष्य अंधारात सापडले आहे.

काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. त्यामुळे काश्मिरात दहशत वाढली असून, उद्योग, व्यवसाय, पर्यटनावरही विपरित परिणाम झाला. त्यातच आता या दहशतवादी हल्ल्याने काश्मीरच्या हँडलूम उद्योगावर शोककळा पसरल्याचे चित्र आहे. काश्मिरी शाली, गालिचे, महिलांचे कपडे बनवणे हे उद्योग ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे दोन-अडीच लाख लोकांच्या हातचा रोजगार गेला. पर्यटकांनीच पाठ फिरवली तर शाली, गालिचे घेणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत असून, व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.

काश्मीरमध्ये फिरण्यासाठी जाणारे पर्यटक तिथल्या शाली आणि गालिचांकडे आपोआप आकर्षित होतात. शाली आणि गालिचे बनवण्यासाठी मोठी मेहनत आणि एकाग्रता लागते. या दोन सूत्रांवर हा व्यवसाय आजही तग धरून आहे. डिझाइनच्या शाली आणि महिलांच्या ड्रेसवर बनवले जाणारे नक्षीकाम हे हाताने केले जाते. त्यामुळे या हस्तकलेला विशेष महत्त्व आहे.

शाली आणि महिलांच्या कपड्यावरील नक्षीकामानंतर येथे गालिचे बनतात. त्यासाठीसुद्धा एकाग्रता आणि संयम लागतोच. अचूक आणि सावधगिरीने हे गालिचे बनवतात. त्यासाठी अनुभवही खूप महत्त्वाचा मानला जातो. एक गालिचा बनवायला किमान सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागतो. म्हणूनच काश्मीरच्या या गालिचांची किंमतसुद्धा डोळे विस्फारणारी असते. त्यावरील करण्यात येणा-या आकर्षक नक्षीकामामुळे या गालिचांना देशातच नव्हे तर जगभरात मोठी मागणी आहे.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी पर्यावरणाचा ‘देववन-घनवन’ संकल्प
02:03
Video thumbnail
Amit Deshmukh|भारतात आता लोकशाही फक्त नावालाच!’ आ.अमित देशमुखांचा भाजपवर पलटवार
01:56
Video thumbnail
Ajitdada Pawar Jayanti|जयंतीदिनीही एकच सवाल... अजितदादांच्या मृत्यूमागचं गूढ कधी उकलणार?
01:19
Video thumbnail
Nanded|नरसीत घराला आग दीड लाख रकमेसह अडीच लाखाचे साहित्य जळून खाक
00:50
Video thumbnail
Latur|धक्कादायक!चाकुर पंचायत समिती कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
04:28
Video thumbnail
Ajitdada Pawar Jayanti|दादांच्या आठवणींना उजाळा; सुनेत्रावहिनी पवार आणि जय पवार भावूक
00:40
Video thumbnail
Latur|भिंतींवर पिचकाऱ्या, दुर्गंधी अन् घाण; लातूरच्या प्रशासकीय इमारतीचा श्वास कोंडला
03:17
Video thumbnail
Latur|पूर्णा येथे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर
01:18
Video thumbnail
Parbhani|परभणीतील लक्ष्मी नगरात चारचाकीतून गाईची चोरी;घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
02:59
Video thumbnail
Latur|10 वर्षे विना वेतन सेवा; तीन शिक्षकांचे 24 दिवसांपासून उपोषण
03:16
Video thumbnail
Latur|दिल्लीतील लाठीचार्जचे पडसाद उदगीरमध्ये; बहुजन विकास अभियान रस्त्यावर
02:32
Video thumbnail
Latur|स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आठवडाभर सर्वरोग निदान शिबिर
02:32
Video thumbnail
Latur|FDA च्या कारवाईला न जुमानता सील तोडली; बेकरी मालकावर गुन्हा!
02:07
Video thumbnail
Latur|टँकरने पाणी विकत घेऊन पिके जगवण्याची वेळ; बळीराजावर दुहेरी संकट
04:55
Video thumbnail
ट्रकच्या जोरदार धडकेत व्यक्ती गंभीर जखमी; सिग्नल व्यवस्था बंद असल्याने नागरिकांचा संताप
01:07

Latest news