चाकूर : अ.ना.शिंदे
दिंनाक २७ ऑगस्ट रोजी बुधवारी रात्री सायंकाळी पाचच्या सुमारास सुरू झालेला पाऊस मुसळधार पाऊस रात्रभर सुरू होता. तर आज गुरुवार २८ ऑगस्ट रोजी सकाळ पासुनच मुसळधार पावसाने लातूर जिल्ह्यात हजेरी लावली. चाकूर तालुक्यात चाकूरसह परिसरातील सर्व गावांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे नदी,नाले आणि ओढे तुडूंब,नागरिकांच्या राहत्या घरात पाणी शिरले आहे. अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले आहे. सतत होणा-या पावसामुळे नागरिकांची पंचाईत झाली असुन सर्वत्र एकच धावपळ उडालेली आहे. या पावसाने नदी काठाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.घरणी नदीला पुर आला असुन पुलावरून पाणी वाहत आहे.या पुरामुळे नदीकाठच्या शेतीत पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
टाकळगावातील १० ते १५ घरात पाणी शिरले आहे.शेळगाव जवळील तिरू नदीला पुर आला आहे.तसेच बोथी,राचन्नावाडी येथील नद्या तुंडूंब भरून वाहत आहेत. नायगाव , हिंपळनेर ,हानमंत जवळगा या भागातील नद्याना पुर आला आहे. झरी,जानवळ या भागातही नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. सुगाव गावात पावसाचे पाणीच पाणी झाले असुन घरात पाणी शिरले आहे.
नळेगाव जवळील उदगीर रोडवर पाणी साचल्याने वाहतूक खोळबंली होती. आटोळा, तिवघाळ, तळघाळ, उजळंब, रोहीणा या भागातही आढे-नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. तालुक्यात मुसळधार पावसाने अनेक गावात घरांची पडझड झाल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान या पावसाने चाकूर शहरातील उजळंब रोडवरील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे.चाकूर व परिसरात अनेक गावात विजांच्या कडकडासह पाऊस झाला. दरम्यान वीज गुल आणि रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
उजळंब रोडवरील अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांना घरातील पाणी उपसण्याची वेळ आली. तर काहींना घरातील पाणी बाहेर काढून देण्याची वेळ आल्याने लहान बालके आणि महिलांना त्रास सोसावा लागला आहे.चाकुरातील लक्ष््मी नगर,बौध्द नगर, सुतार वाडा,पेट मोहल्ला, धनगर वाडा या भागाला व तेथील परिसराला तलावाचे स्वरुप आले आहे.नाल्या तुडुंब भरून वाहल्याने ते पाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.
















