21.7 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeराष्ट्रीयनिवडणूक आश्वासनाचे बळी; तेलंगणात ५०० कुत्र्यांची हत्या

निवडणूक आश्वासनाचे बळी; तेलंगणात ५०० कुत्र्यांची हत्या

कामारेड्डी : वृत्तसंस्था
तेलंगणाच्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांना जीवे मारल्याची प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या एका आठवड्यात, वेगवेगळ्या जिल्ह्यांतील गावांमध्ये सुमारे ५०० कुत्र्यांची कथितरित्या हत्या करण्यात आली आहे. पोलिसांच्या मते, या घटनांमध्ये पंचायत प्रतिनिधींची भूमिका समोर येत आहे.

ताजे प्रकरण कामारेड्डी जिल्ह्यातील आहे. येथे पालवंचा मंडळातील ५ गावांमध्ये भवानीपेट, पालवंचा, फरीदपेट, वाडी आणि बंदारामेश्वरपल्ली गावांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांत सुमारे २०० भटक्या कुत्र्यांना मारल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पाच सरपंचांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी, हनमकोंडा जिल्ह्यातील श्यामपेट आणि अरेपल्ली गावांमध्ये ६ जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान सुमारे ३०० भटक्या कुत्र्यांची हत्या झाल्याचे प्रकरण समोर आले होते. पोलिसांनी या संदर्भात दोन महिला सरपंच आणि त्यांच्या पतींसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

गावांशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांदरम्यान काही उमेदवारांनी भटक्या कुत्र्यांच्या आणि माकडांच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. आरोप आहे की, निवडणूक जिंकल्यानंतर तीच आश्वासने कुत्र्यांना मारून पूर्ण केली जात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR