फडणवीसांनी महाराष्ट्राच्या हिताचे काम करावे

छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा निवड झाली आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो, आता त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी काम करावे, अशा शब्दांत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे १३२ आमदार निवडून आले आहेत, ते कसे आलेत हे सगळ्यांना माहीत आहे.

आता फडणवीस यांनी फक्त लाडक्या बहिणींसाठी नाही, तर लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके बेरोजगार या सगळ्यांसाठी काम करावे, असा टोलाही इम्तियाज जलील यांनी लगावला. विधानसभेच्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून इम्तियाज जलील यांचा अवघ्या २१०० मतांनी पराभव झाला.

दरम्यान, मतदानाच्यावेळी भाजपचे उमेदवार मंत्री अतुल सावे यांच्याकडून पैसे वाटप करण्यात आले होते, याचा व्हीडीओ आणि इतर पुरावे इम्तियाज जलील यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवले होते. तसेच जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार देऊन चौकशीची मागणी केली होती. या तक्रारीच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली होती.

या समितीने आपला अहवाल दिला असून त्यात सावे यांनी पैसे वाटल्याचे सिद्ध होत नसल्याचे म्हटले आहे. यावर इम्तियाज जलील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मी हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत घेऊन जाणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. याचवेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत, याबद्दल विचारले असता इम्तियाज जलील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
ते करत असतानाच फडणवीसांनी आता समाजातील सगळ्या घटकांसाठी काम करावे, केवळ लाडक्या बहिणींसाठी नाही, असा चिमटा काढला. महाराष्ट्रात महायुती बहुमताने जिंकली. एकट्या भाजपने फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १३२ आमदार निवडून आणले, ते कसे आले हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

पण आता ते मुख्यमंत्री होत आहेत, म्हटल्यावर त्यांचे नक्कीच अभिनंदन करावे लागेल. फक्त त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी काम करावे. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम, शेतक-याच्या मलाला भाव द्यावा, एवढीच अपेक्षा असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news