लातूर : प्रतिनिधी
बसवकल्याण येथे पार पडणा-या बसव भारत उत्सवास राज्यभरातून लाखो भाविक जाणार आहेत. हा उत्सव म्हणजे शरण संस्कृतीचा एक जागतिक महोत्सव असल्याचे प्रतिपादन बसवकल्याण क्षेत्र समितीचे राज्य अध्यक्ष माधव पाटील टाकळीकर यांनी येथे
केले.
येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सभागृहात बसव भारत उत्सव २०२७ च्या प्रचार-प्रसार व नियोजनासाठी केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. अमरनाथ सोलपुरे यांच्या उपस्थितीत बसवकल्याण क्षेत्र समिती राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी उपाध्यक्ष विजयकुमार हत्तूरे, सचिव डॉ. शेषराव शेटे, सूर्यकांत विश्वासराव, उमाकांत आंधळे, काशिनाथ भातगुणकी, आत्मलिंग शेटे, शिवाजी भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात डॉ.अमरनाथ सोलपुरे म्हणाले की, अनुभव मंडप ही जागतिक लोकशाहीची पहिली संसद असून हा भारत देशाचा अभिमान आहे, म्हणूनच हे जागतिक सेंटर व आकर्षण राहणार आहे. प्रास्ताविक सुनील हेंगणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजेश विभुते यांनी तर आभार विजयकुमार गुत्ते यांनी मानले. सदर बैठकीत राज्यातील जिल्हा व तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली. कार्यकारिणीत लातूर शहराध्यक्ष प्रा. भालचंद्र येडवे, दयानंद सावळगी, उपाध्यक्ष प्रदीप हालकंचे, बसवेश्वर हेंगणे, विजयकुमार कुबसे, अॅड. शरद चौधरी, संग्राम मलशेट्टी, कार्याध्यक्ष अॅड. शेखर हवीले, कोषाध्यक्ष प्रा. नागेश सुगरे, सचिव सचिन डमाले, सहसचिव रितेश पाटील, मार्गदर्शक गुरुनाथ उच्चेकर, संघटक प्रदीप कोडे, सदस्य शिवपुत्र शिवणगे, शिवकुमार पटवारी, राहुल डोंबे, महेश अंबुलगे आदी.
महिला अध्यक्ष विजयालक्ष्मी पत्रिके, उपाध्यक्ष स्वाती सुगरे, वैष्णवी पाटील, नीता मेनकुदळे, सविता ककलाने, सदस्य शिवकन्या पावले. लातूर जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीत अध्यक्ष विजयकुमार गुत्ते, उपाध्यक्ष परमेश्वर पावले, शंकर रोडगे, शिवाप्पा मंदाडे, आर. सी. पाटील, किशोर बिराजदार, राजकुमार कत्ते, महेश पाटील, सचिव दिगंबर गरिबे, सहसचिव राजेंद्र मंठाळे, कार्यवाहक विजयकुमार वाकडे, मार्गदर्शक महालिंग मिटकरी, सल्लागार अरुण मेंडोळे, संघटक संग्राम बमने, सहसंघटक सिद्धलिंग मेंडोळे आदींचा समावेश आहे.
















