वसई- विरारमध्ये पूरस्थिती गंभीर; ३ दिवसांपासून वीज,मोबाईल नेटवर्क बंद

मुंबई : गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भाग अजूनही पाण्याखाली असून काही ठिकाणी सलग तीन दिवसांपासून वीजपुरवठा बंद आहे. वीज आणि मोबाईल नेटवर्क ठप्प झाल्याने नागरिकांना दैनंदिन जीवन जगणेही कठीण झाले आहे.

वीज नसल्यामुळे अनेक घरांमधील पिण्याच्या पाण्याचा साठा संपला आहे. काही भागांत नागरिकांना पावसाचे पाणी साठवून वापरण्याची वेळ आली आहे. अन्न, पिण्याचे पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत असून अनेक कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, या आपत्कालीन परिस्थितीचा काही ठिकाणी गैरफायदा घेतला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवण्यात आल्याचा तसेच रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

मोबाईल नेटवर्क अनेक भागांत पूर्णपणे बंद पडल्याने नागरिकांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. अनेकांना कामाच्या ठिकाणी जाता येत नसल्याने रोजगाराचीही चिंता निर्माण झाली आहे. नागरिकांनी प्रशासन आणि राज्य सरकारने तातडीने वीजपुरवठा, दूरसंचार सेवा आणि अत्यावश्यक सुविधांची व्यवस्था पूर्ववत करावी, अशी मागणी केली आहे.

पूरामुळे वसई आणि विरारमधील वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने रिक्षा, एसटी आणि स्थानिक परिवहन सेवा ठप्प झाली आहे. काही भागांत गंभीर रुग्णांपर्यंत रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्याने स्वयंसेवी संस्थांनी ट्रॅक्टरच्या मदतीने रुग्णांना सुरक्षितपणे रुग्णालयात हलवले.

दरम्यान, वसई-विरार महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके बचावकार्यात गुंतली असून राजावली, भोयदापाडा, कामण, चिंचोटी, वाघराळपाडा, मधुबन, विरार आणि इतर पूरग्रस्त भागांतून अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, पूरग्रस्त भागांमध्ये वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि संपर्क व्यवस्था लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news