शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
साकोळ येथील शेतकरी व ग्रामस्थांनी शेतीसाठी किमान आठ तास अखंडित व सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी केली आहे. सध्या वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी देणे अडचणीचे होत असून शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. अनियमित वीज पुरवठयामुळे ठिबक व फवारणीसारखी कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. रात्री उशिरा किंवा अनियमित वेळेत वीज दिली जात असल्याने शेतक-यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी व ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाकडे तातडीने लक्ष देऊन दररोज किमान आठ तास सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी अब्दुलअजीज मुल्ला, आशिष धुमाळे, शेतकरी नेते माणिक गायकवाड, महेश तिवारी, माधवराव बर्गे, प्रवीण सूर्यवंशी, काशिनाथ कडेकर, राजू बर्गे, शौकत बागवान, चंचल मुनाळे, कमलाकर मांदळे, मनोज वाघमारे, पप्पू भिक्का, सुमित आवळे, पक्कु दामा, मुन्ना भालके, कपिल जांभळे, शिंदे बालाजी, माधव सूर्यवंशी, तानाजी सूर्यवंशी, सत्यम पाटील, बसू भुरे, अजय रावळे, अजय पाटील, जगदीश साकोळे, मलिकार्जुन भुजंगा, राजकुमार होनमाळे, आशुतोष महाजन, सचिन मादळे, गुणवंत डोंगरे, सुनील महाजन, शंकर वलांडे, धोंडीराम बिबराळे, माने आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
















