सोयाबीन बियाणे उगवलेच नाही; राज्यात २४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

मुंबई : प्रतिनिधी
खरीप हंगामात सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे राज्यातील २४ हजार ६६७.५४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. याप्रकरणी राज्यभरातून १७ हजार ४७३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, संबंधित बियाणे कंपन्यांविरुद्ध आतापर्यंत ८५ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी (दि. २९) पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘‘राज्यात यंदा सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ४७.२१ लाख हेक्टर असून २७ जुलैअखेर सुमारे ४५.१० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. हंगामासाठी सोयाबीन बियाणांची गरज १३.१२५ लाख क्विंटल असताना राज्यात एकूण १८.५७ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले होते. पुरेसा बियाणे साठा असतानाही काही कंपन्यांच्या बियाणांची उगवण न झाल्याने शेतक-यांना दुबार पेरणीचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.

अकोला, अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळमधून सर्वाधिक तक्रारी
सोयाबीन बियाणांच्या उगवण क्षमतेबाबत राज्यात प्राप्त झालेल्या तक्रारींची संख्या १७ हजार ४७३ आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अकोला, अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील तक्रारींचा समावेश आहे. प्राप्त तक्रारींपैकी तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांनी १० हजार १३५ प्रकरणांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तपासणीसाठी सोयाबीन बियाणांचे ७ हजार ८९१ नमुने घेण्यात आले. प्रयोगशाळांच्या अहवालानुसार त्यापैकी १ हजार ८२ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले आहेत.

अप्रमाणित बियाणांच्या प्रकरणात संबंधित कंपन्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. अहवालात तक्रारी प्राप्त झालेल्या प्रमुख कंपन्यांमध्ये बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रा.लि., रवी हायब्रीड सीड्स अँड रिसर्च, यशोदा आणि पार्श्व जेनेटिक्स एलएलपी आदींचा समावेश आहे.

खतांची कमतरता नाही; २०.७३ लाख टन साठा शिल्लक
राज्यात खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. खरीप २०२६ साठी ५०.५० लाख टन खतांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ४८.८० लाख टन नियोजनाला मंजुरी मिळाली. प्रत्यक्षात हंगामासाठी ५०.८० लाख टन खतांची उपलब्धता झाली आहे. राज्यात २७ जुलैपर्यंत ३०.०९ लाख टन खतांची विक्री झाली असून, सध्या २०.७३ लाख टन खतसाठा उपलब्ध आहे.

राज्यात खरिपाची पेरणी ८४ टक्क्यांवर
राज्यात खरीप पिकांचे पाच वर्षांचे सरासरी क्षेत्र १४४.३६ लाख हेक्टर आहे. २९ जुलैअखेर राज्यात १२०.८४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, हे प्रमाण सरासरी क्षेत्राच्या ८४ टक्के आहे. गतवर्षी २९ जुलै २०२५ पर्यंत १३२.७७ लाख हेक्टर, म्हणजे सरासरीच्या ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदा पेरणीचे क्षेत्र ११.९३ लाख हेक्टरने कमी आहे. गतवर्षीची अंतिम खरीप पेरणी १४३.५५ लाख हेक्टर होती.

अमरावती आघाडीवर, ठाणे पिछाडीवर
राज्यात सर्वाधिक पेरणी अमरावती विभागात झाली आहे. या विभागात २८.९५ लाख हेक्टर क्षेत्रावर, म्हणजे सरासरीच्या ९२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. ठाणे विभागात सर्वांत कमी पेरणी झाली असून, तेथे १ लाख ५४ हजार ६७४ हेक्टर क्षेत्रावर, म्हणजे अवघी ३९ टक्के पेरणी झाली आहे. मराठवाड्यात पेरणीचे प्रमाण ८६ टक्के, तर विदर्भात ८१ टक्के नोंदविण्यात आले आहे. राज्यात १ जून ते २८ जुलै या कालावधीत सरासरी ४८०.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हे प्रमाण अपेक्षित सरासरीच्या ९४.८५ टक्के आहे. कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची तूट कायम आहे. कोकण विभागात सर्वाधिक १,८१५.०१ मिलिमीटर, म्हणजे सरासरीच्या १११ टक्के पाऊस झाला आहे. विदर्भात सर्वांत कमी ३७४.६ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या ७३ टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. तर पुणे विभागात ८७, नाशिक ८३, संभाजीनगर ७७ टक्के पाऊस झाला आहे

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news