६० व्यापारी जहाजे भारतात

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील अत्यंत महत्त्वाच्या आणि मोक्याच्या मानल्या जाणा-या होर्मुज सामुद्रधुनीच्या मार्गावरील जहाजांच्या वाहतुकीबाबत भारताला दिलासा देणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहेत. होर्मुज सामुद्रधुनीतून ६० मोठी व्यापारी जहाजे सुरक्षितपणे बाहेर पडली असून भारतापर्यंत पोहोचली आहेत. तसेच ३९७२ खलाशांना सुरक्षितपणे परत आणण्यात आले आहे.

संसदेतील एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने सांगितले की, आखाती प्रदेशातून ३,९७२ भारतीय खलाशांना परत आणण्यात आले, तर एका २४ तास कार्यरत असलेल्या संकट व्यवस्थापन प्रणालीने हजारो कॉल्स आणि ईमेल्स हाताळले. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून ६० व्यापारी जहाजे बाहेर काढण्यात आली असून ती भारतात सुखरूप पोहोचली आहेत. सरकारने या मोहिमेसाठी विशेष योजना आखली होती. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी खलाशांना संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले होते.

मंत्रालयाने म्हटले आहे की, होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणा-या सागरी प्रवासाबाबत मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली होती. त्यामुळे भारतीय प्रवशांना धोकादायक कामे करण्याबाबत दबाव नव्हता. संघर्षग्रस्त क्षेत्रांमध्ये, संबंधित खलाशाच्या संमतीने केवळ आपत्कालीन परिस्थितीतच कर्मचारी बदलास परवानगी आहे. स्थलांतर आणि मायदेशी परत आणण्याच्या कार्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी, एक समर्पित २४७७ नियंत्रण कक्ष आणि नौवहन महासंचालनालयाचे सागरी क्षेत्र जागरूकता केंद्र अहोरात्र कार्यरत आहेत. नियंत्रण कक्षाने खलाशी, त्यांचे कुटुंबीय आणि सागरी क्षेत्राशी संबंधित इतर लोकांकडून आलेले १५,७७१ फोन कॉल्स आणि ३६,४९९ ईमेल्स हाताळले आहेत. भारतीय खलाशांची नियुक्ती परवानाधारक भरती आणि नियुक्ती सेवा एजन्सी मार्फत केली जाते. प्रमाणित नियामक मंजुरीशिवाय कोणताही खलाशी इमिग्रेशन क्लिअरन्स पूर्ण करू शकत नाही.

देशात एलपीजीचा तुटवडा नाही
होर्मुज सामुद्रधुनी हा जगातील तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीसाठीचा अत्यंत संवेदनशील आणि प्रमुख मार्ग आहे. इराण संकटाच्या काळात शिवालिक, नंदा देवी, लाडकी, पाइन गॅस, जग वसंत, बीडब्ल्यूडी टेल, बीडब्ल्यूईएलएम आणि ग्रीन सान्वी ही जहाजे भारतात आणण्यात आली होती. या जहाजांमुळे देशातील एलपीजीचा तुटवडा कमी करण्यास मदत झाली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news