23.8 C
Latur
Wednesday, March 11, 2026
Homeराष्ट्रीयमहाराष्ट्रातील मुले समुद्रात बुडाली

महाराष्ट्रातील मुले समुद्रात बुडाली

तरूणीचा मृत्यू, एकाचा शोध सुरू

चेन्नई : शहरातील आयटी कंपनीत काम करणा-या महाराष्ट्रातील मुलांसोबत दुर्दैवी घटना घडली आहे. सुटी निमित्त चेन्नईच्या गोल्डन बीचवर फिरायला गेलेल्या २६ तरूणांपैकी तिघेजण पाण्यात वाहून गेले. त्यातील भंडारा येथील मुलीचा मृतदेह सापडला आहे. एका मुलाचा अद्याप शोध सुरू असून एकाला सुखरुप वाचवले आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला. स्थानिक सरकारकडून सध्या समुद्रात सर्च ऑपरेशन सुरू आहे. महाराष्ट्र सरकारही या घटनेवर लक्ष ठेवून असून पीडित कुटुंबाला लागणारी सर्व मदत करण्यासाठी संपर्क केला जात आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलीय की, चेन्नई (तामिळनाडू) येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटासोबत पाण्यात उतरताना दुर्घटना घडली. या घटनेत महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला असून मी मदत व बचाव कार्यावर सतत देखरेख ठेवून आहे. तामिळनाडू शासनाकडून प्राप्त माहितीनुसार २६ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३ विद्यार्थी पाण्यात उतरले होते. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील मयुरी चौधरी यांना दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला तर जय पाटील यांचा शोध अद्याप लागलेला नाही, त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

राज केदारी याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. चेन्नई (तामिळनाडू) येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटासोबत पाण्यात उतरताना दुर्घटना घडली असून या घटनेत महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेतली. त्याशिवाय जय पाटील यांचे नातेवाईक चेन्नई येथे पोहोचले असून मयुरी चौधरी यांचे नातेवाईक नागपूरहून चेन्नईकडे रवाना झाले आहेत.

सरकारने मदतकार्य वाढवावे : फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दु:खद घटनेबद्दल मयुरी चौधरी यांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोक व्यक्त करत संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच तामिळनाडू सरकारने शोध व बचाव कार्य अधिक गतीने राबवून सर्वतोपरी मदत करावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य प्रशासन संबंधित कुटुंबीयांच्या सतत संपर्कात असून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जात आहे असेही मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR