दहशतवादी हल्ल्याचा धोका, गुप्तचर विभागाचा अलर्ट
नवी दिल्ली : इंटेलिजन्स ब्युरोने १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी केला आहे. दिल्ली पोलिसांना १० पानी अहवाल सादर करण्यात आला असून, त्यात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयबीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटना हल्ल्याचा कट रचत आहेत. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयएसने दोन्ही दहशतवादी संघटनांच्या नेत्यांना हल्ले करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १५ ऑगस्टला हल्ला करण्यासाठी दहशतवादी व एव्ही म्हणजेच मानवरहित हवाई वाहने आणि पॅराग्लायडरचा वापर करू शकतात, असे आयबीचे म्हणणे आहे. त्यामुळे बीएसएफला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
या अहवालात दिल्लीतील ज्या ठिकाणी सर्वाधिक रोहिंग्या राहतात. त्या ठिकाणांवर कडक नजर ठेवण्यास सांगितले आहे. याशिवाय दिल्ली पोलिसांना कट्टरपंथी गटांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.दहशतवादी संघटना हल्ल्यासाठी यूएव्ही आणि पॅराग्लायडरचा वापर करू शकतात, त्यामुळे बीएसएफला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
लाल किल्ल्याभोवती
कडेकोट बंदोबस्त ठेवा
गुप्तचर विभागाने आपल्या अहवालात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची नुकतीच झालेली हत्या आणि उदयपूर, अमरावती येथील घटनांचा उल्लेख केला आहे. दिल्ली पोलिसांना गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. लाल किल्ल्याभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.