चंद्रपूर : चंद्रपूर-मूल मार्गावरच्या अजयपूर येथे अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणा-या ट्रक यांच्यात समोरासमोर काल रात्री जोरदार धडक झाली. या धडकेनंतर ट्रकचा टायर फुटून अपघात झाला. ट्रकचे टायर फुटल्यानंतर आग भडकली. अजयपूर गावाजवळ काल रात्री हा भीषण अपघात झाला.
पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणा-या ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर भीषण आग लागली. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटले. त्यानंतर आग भडकली. ही भीषण आग मूल-चंद्रपूर अग्निशमनाच्या पथकाने विझवली. आगीमुळे मृतदेह जळल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिस तपास सुरु आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे.
अजयपूर गावाजवळ काल रात्री हा अपघात झाला होता. पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर भीषण आग लागली. भडकलेली आग मूल-चंद्रपूर येथील अग्निशमन पथकांनी सकाळपर्यंत विझविली. आगीमुळे मृतदेह राख झाल्याची विदारक दृश्ये नजरेस पडली. प्लास्टिक पोत्यांमधून हे शव चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
यातील टँकरमधील चालक अमरावती निवासी हाफीज खान आणि वाहक वर्धा निवासी संजय पाटील यांचा मृतात समावेश आहे.
तर लाकूड भरलेल्या ट्रकमधील ७ जणांचा अपघातात कोळसा झाला आहे. ट्रकमधील ७ जण बल्लारपुर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत तपास सुरू आहे.