23.4 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeमहाराष्ट्रबाळासाहेबांचा सरकारविरोधात ‘एल्गार’

बाळासाहेबांचा सरकारविरोधात ‘एल्गार’

एकमत ऑनलाईन

अहमदनगर : शेतकरी संकटात असताना सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असते. मात्र मेट्रो आणि स्मार्ट सिटीकडे लक्ष देर्णा­या सरकारचे शेतर्क­यांकडे दुर्लक्ष झालं आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. आजारपणातून सावरुन थोरात यांनी सरकाविरोधात ‘एल्गार’ पुकारल आहे.

संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शेतक-यांच्या विविध प्रश्नांसाठी मोर्चा व धरणे आंदोलन झाले. आजारपणानंतर थोरात प्रथमच थेट रस्त्यावरील आंदोलनात सहभागी झाले होते.

a भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कांदा या सर्व पिकांचे भाव पडले आहेत. कांदा उत्पादनासाठी खर्च मोठा येत असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने शेतक-­यांना प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त भाव द्यावा व कोणत्याही शेतक-­यांची वीज कनेक्शन कट करू नये, अशी मागणी थोरात यांनी केली.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या