नवी दिल्ली: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर, प्रशासनासह स्थानिक लोक पीडितांच्या मदतीसाठी रात्रभर व्यस्त होते. त्यांनी मदत आणि बचाव पथकाच्या ट्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात मदत तर केलीच, पण जखमींना वैद्यकीय सेवा पुरवण्यात आणि गरज पडेल तेव्हा त्यांना रक्त देण्यातही ते मागे राहिले नाहीत. घटनास्थळी भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बालासोरच्या लोकांचे कौतुक केले. राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे ओडिशातील जनतेचे आभार मानले आणि सांगितले की, राज्यातील जनतेचा मला अभिमान आहे.
नवीन पटनायक म्हणाले की, मला ओडिशातील लोकांचा, विशेषत: बालासोरच्या नागरिकांचा अभिमान आहे, ज्यांनी या भीषण रेल्वे अपघातात मदत केली.शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी मोठ्या संख्येने लोक पुढे आले. मला त्या सर्व लोकांचे आभार मानायचे आहेत. पीडितांना रक्ताची गरज असताना लोक रक्तदानासाठी पुढे आले. या भीषण दुर्घटनेच्या वेळी मदतीसाठी पुढे आलेल्या ओडिशातील लोकांचा मला अभिमान आहे.