सारे काही बीसीसीआय वर अवलंबून
मुंबई : भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणही ‘आयपीएल’च्या आयोजनाबाबत आशावादी असून त्याने एकाच राज्यातील तीन-चार स्टेडियम्सवर ‘आयपीएल’च्या लढती खेळवण्याचे सुचवले आहे. ‘‘सध्याचे चित्र पाहता, ‘आयपीएल’चे आयोजन अद्यापही होऊ शकते, असे मला वाटते. परंतु ‘बीसीसीआय’ने अशा राज्यात सामन्यांचे आयोजन करावे, जेथे ३-४ स्टेडियम्स उपलब्ध असतील. यामध्ये वाहतुकीचा प्रश्न भेडसावेल, मात्र चाहत्यांच्या तसेच सामने रंगतदार करण्याच्या दृष्टीने किमान वेगवेगळ्या खेळपट्टयÞांवर लढती खेळवता येतील,’’ असे लक्ष्मण म्हणाला.
लक्ष्मणने सुचवल्यानुसार वानखेडे, बेब्रॉर्न, डी. वाय. पाटील आणि गहुंजे यांसारखे स्टेडियम महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे ‘बीसीसीआय’ महाराष्ट्राला ‘आयपीएल’च्या आयोजनाची संधी देणार का, हे पाहणे रंजक ठरेल. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा रद्द होण्याची शक्यता असली, तरी इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) आयोजन नक्कीच करता येऊ शकते, असा आशावाद भारताचा माजी फिरकीपटू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीचा अध्यक्ष अनिल कुंबळेने व्यक्त केला.
Read More आम्हा दोघांमध्ये तिसऱ्याच्या मध्यस्थीची गरज नाही, चीनने ट्रंप यांची ऑफर धुडकावली
‘‘निश्चितच यंदाच्या वर्षांत ‘आयपीएल’चे आयोजन होण्याबाबत मी अद्यापही आशावादी आहे. विश्वचषक पुढे ढकलण्यात येण्याची दाट शक्यता आहे. तसे न झाल्यास विश्वचषकापूर्वीच्या काळातील मालिकांऐवजी ‘आयपीएल’आयोजन खेळवावी,’’ असे कुंबळे म्हणाला. ‘‘आयपीएल झाल्यास प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणे अशक्य आहे. मात्र घरबसल्या चाहते नक्कीच सामने बघतील आणि त्याद्वारे आर्थिक नुकसानाची भरपाई करता येणे शक्य आहे,’’ असेही कुंबळेने सांगितले.
रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार !

मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणारा रोहित शर्मा हा आयपीएलमधला यशस्वी कर्णधार मानला जातो. आतापर्यंत रोहितने आपल्या नेतृत्वाखाली मुंबईला आयपीएलमध्ये चार विजेतेपदं मिळवून दिली आहेत. अनेकदा काही माजी खेळाडूंनी टी-२० भारतीय संघाचं नेतृत्व रोहितकडे द्यावं अशी मागणी केली होती. भारताचा माजी फलंदाज व्ही.व्ही.एस.लक्ष्मणनेही रोहितच्या खेळाचं कौतुक करत, आयपीएलमध्ये तो यशस्वी कर्णधार ठरण्यामागचं कारण सांगितलं आहे.
‘‘माझ्यामते डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळत असताना रोहितमध्ये सर्वातप्रथम हे नेतृत्व कौशल्य निर्माण झालं. पहिल्या वर्षी तो संघात आला, तेव्हा तो तुलनेने नवीन होता.
तरीही मधल्या फळीत त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती पाहण्यासारखी होती. सुरुवातीच्या हंगामात डेक्कन चार्जर्सची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती, मात्र रोहितने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं होतं. प्रत्येक सामन्यागणित त्याचा आत्मविश्वास वाढत जातो. तो ज्या पद्धतीने आपल्या सहकारÞ्यांना विश्वास देतो, गोलंदाजांना मार्गदर्शन करतो हे पाहण्यासारखं असतं. पण यापेक्षाही महत्वाचं म्हणजे तो खडतर काळात स्वत:वर दबाव येऊ देत नाही. याच कारणामुळे तो आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार आहे.
’’ लक्ष्मण स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होता. देशातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मध्यंतरी आॅक्टोबर महिन्यात आॅस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलत त्या जागी आयपीएल खेळवण्याची चर्चा सुरु होती. मात्र आयसीसीने यासंदर्भातली आपली बैठक १० जूनपर्यंत पुढे ढकलली असल्यामुळे अद्याप टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल निर्णय घेण्यात आलेला नाहीये. मात्र यंदाची आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे, त्यामुळे बीसीसीआय वर्षाअखेरीस ही स्पर्धा खेळवता येते का याची चाचपणी करत आहे.