नांदेड: प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत मुलीने बाजी मारली असून जिल्ह्याचा सरासरी८३.६२ टक्के निकाल लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ८.३१ टक्के निकाल कमी लागला असून कॉफी मुक्तीचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी ११ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात जिल्ह्याचा सरासरी ८३.६५ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यातून प्रथम बिलोली तालुकाचा निकाल ९२. २८ टक्के लागला असून सर्वात कमी कंधार तालुक्याचा निकाल ६८.७७ टक्के लागला आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ८८.७६ असून मुलांची ७८.८७ एवढी टक्केवारी आहे गतवर्षी ९१.८३ टक्के निकाल लागला होता.
यावर्षी कॉफी मुक्तीचा परिणाम झाला असून ८३.६२ टक्के एवढा निकाल लागला आहे. यात ८.३१ टक्के ची तफावत आहे. जिल्ह्यात एकूण ४८ हजार ६९ जणांनी दहावीच्या परीक्षेला नोंदणी केली होती . प्रत्यक्षात ४७ हजार ३३३ जणांनी परीक्षा दिली. ३९ हजार ५८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी कॉफी मुक्ती अभियान राबवले होते.
त्यामुळे यावर्षी त्याचा परिणाम निकालावर झाला. असून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाचा टक्का घसरला आहे. मात्र परंपरेनुसार जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली असून ८८. ७६ टक्के मुली उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा महाविद्यालयात जल्लोष स्वागत करण्यात आले. पेढे वाटून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. तर काही जनाचा हीरमोड झाला आहे.
















