नेपाळमध्ये २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय नोटांना परवानगी

काठमांडू : नेपाळने भारतीय आणि नेपाळी नागरिकांना २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय नोटा देशात आणण्याची किंवा बाहेर नेण्याची परवानगी दिली आहे. यामुळे २०१६ च्या नोटाबंदीनंतर लागू असलेली आणि केवळ १०० रुपयांपर्यंतच्या नोटांना परवानगी देणारी जवळपास दशकभराची बंदी संपुष्टात आली आहे.

नेपाळ राष्ट्र बँकेने गुरुवारी पुन्हा जारी केलेल्या एका सूचनेत म्हटले आहे की, विद्यमान नियमांनुसार भारतीय आणि नेपाळी नागरिक ९ नोव्हेंंबर २०१६ रोजी किंवा त्यानंतर जारी केलेल्या २०० आणि ५०० रुपयांच्या भारतीय नोटा, प्रति व्यक्ती २५,००० रुपयांच्या मर्यादेपर्यंत सोबत बाळगू शकतात.आवश्यक नियम तयार केल्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी नेपाळच्या राजपत्रामध्ये (गॅझेट) प्रकाशित सूचनेद्वारे या तरतुदींची माहिती आधीच देण्यात आली होती; तरीही, नियमांची पुन्हा आठवण करून देण्यासाठी आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टता आणण्यासाठी एनआरबीने ही सूचना पुन्हा जारी केली.

नेपाळी नागरिकांनाही भारतीय चलनाबाबत नियम लागू
नवीन नियमांचे स्पष्टीकरण देताना ठफइ चे प्रवक्ते गुरु प्रसाद पौडेल यांनी शनिवारी सांगितले की, नेपाळी नागरिक भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशातून नेपाळमध्ये भारतीय चलन आणू शकत नाहीत. तसेच, ते नेपाळमधून भारताव्यतिरिक्त तिस-या देशात भारतीय चलन नेऊ शकत नाहीत.त्यांनी सांगितले की, या सुधारित तरतुदीमुळे नेपाळला भेट देणा-या भारतीय पर्यटकांना आणि भारतासोबत व्यापार व व्यवसाय करणा-या नेपाळी नागरिकांना सोयीचे ठरेल.

परदेशी पर्यटकांना ५,००० अमेरिकन डॉलर्सचा नियम
सूचनेत असेही म्हटले आहे की, नेपाळी नागरिक आणि परदेशी पर्यटक ५,००० अमेरिकन डॉलर्स किंवा इतर परकीय चलनातील त्यास सममूल्य रक्कम कोणत्याही कस्टम्स डिक्लेरेशनशिवाय (सीमाशुल्क घोषणा) नेपाळमध्ये आणू शकतात.५,००० अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम असल्यास, नेपाळमध्ये आगमन झाल्यावर कस्टम्स विभागाकडे त्याची घोषणा करणे आवश्यक आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news