अहमदपूर : दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान कमी करण्यासाठी प्रत्येक माणसाने झाडे लावणे आवश्यक आहे या सृष्टीला प्रदूषणापासून वाचवायचे असेल तर वृक्ष लागवड करा, असे सुनेगाव सांगवी येथील वनरक्षक विभागाचे राहुल कलशेट्टी यांनी प्रतिपादन केले. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निसर्ग पर्यटन केंद्र सुनेगाव सांगवी येथे महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस महेश देवणे प्रख्यात निवेदक व्याख्याते प्रा.मारोती बुद्रुक पाटील, सविता मारोती बुद्रुक पाटील, प्रिती महेश देवणे, निसर्ग पर्यटन केंद्र सुनेगाव सांगवीचे भीमराव गडकर, वॉचमन महादेव यंचेवाड, व्यंकटराव आमुगे, नाथराव मुसळे, गोंिवंदराव बदने, गोपाळ मुकनर, सतिश माडगे, रोपवाटिकेतील महिला मजूर आदींची उपस्थिती होती
यावेळी कलशेट्टी म्हणाले की, दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान, पावसाचा असमतोलपणा, सृष्टीचे बदलेले चक्र अबाधित राहावे म्हणून वृक्षाची लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक माणसाने येत्या पावसाळ्यात दोन वृक्ष लावावेत. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक,आध्यात्मिक कार्यक्रमात वृक्ष भेट द्यावेत. भेट दिलेले वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे. या सृष्टीला वाचविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले तर येणा-या पिढीसाठी वृक्ष लागवड ही अत्यंत महत्वाची ठरणार आहे. असेही राहुल कलशेट्टी म्हणाले.या वेळी वनरक्षक विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.