मुंबई : महाविकास आघाडीतील बेबनावाचा फायदा भाजपला होईल असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.अपक्षांना स्वत:चे मत आहे. त्यांचा अधिकार ते ठरवतील असेही पाटील म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, महाविकास आघाडीतील एकाची विकेट पडेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यसभेच्या निवडणुकीत देखील भाजपला ११ मतांची गरज होती. ती कशी मिळणार असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, ती मतं मिळाली, आमचा उमेदवार विजयी झाला असेही पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीत बेबनाव आहे, त्याचा फायदा भाजपला होईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांना बेबनाव थांबवता आला नाही, असेही पाटील म्हणाले.
संजय राऊत हे राज्यसभेच्या निवडणुकीनंतर अपक्षांवर तुटून पडले आहेत. अपक्षांना स्वत:चे मत आहे. त्यांचा अधिकार ते ठरवतील असे पाटील म्हणाले. अडीच वर्ष अपक्षांनी साथ दिली मग ते चांगलं आणि एका निवडणुकीत त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणं मतदान केलं असेल तर त्यांना बघून घेऊ असे म्हणणे चुकीचे असल्याचे पाटील म्हणाले.