पुणे : देशातील पहिले डिजिटल विद्यापीठ महाराष्ट्रात लवकरच स्थापन होणार आहे, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. एमबीए आणि पीजीडीएम त्याचप्रमाणे महाविद्यालयांमध्ये बदलत्या काळानुसार, तसेच उद्योगांच्या गरजांनुसार अभ्यासक्रमात बदल व्हावेत,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (पीआयबीएम) संस्थेच्या अकराव्या वार्षिक पदवी प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून टोपे बोलत होते. एमबीए आणि पीजीडीएम अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणा-या २०१८-२०२० या तुकडीच्या ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना टोपे यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली. फायनान्स, मार्केटिंग, ुमन रिसोर्सेस, बिझनेस अनॅलिटीक्स आणि ऑपरेशन्स यांसारख्या शाखांमधील होते. संस्थापक अध्यक्ष रमण प्रीत, आयआयएम अहमदाबादचे माजी संचालक प्रा. जहार शहा, मुंबईचे उप व्यवस्थापकीय संचालक विवेक शर्मा व उद्योगपती आदी उपस्थित होते.
आपण काळाच्या मागे असलेला अभ्यासक्रम शिकवत असू, तर त्याला काही अर्थ नाही. विद्यार्थी पदवी घेऊन उत्तीर्ण होतील, परंतु ते बेरोजगार राहतील. शिक्षणासोबत विविध कौशल्यांचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. अनुभव आणि शिक्षण हे कळीचे मुद्दे आहेत. विद्यार्थ्यांनी नैतिकता, नितीमत्ता, नम्रता आणि तत्त्वे ही जीवनमूल्ये अंगिकारावी. शॉर्टकटच्या मार्गाने यशप्राप्तीचा दृष्टीकोन नसावा. करियरसोबतच सामाजिक बांधिलकी, दयाळूपणा आणि शांतताप्रिय, प्रामाणिकपणा असावा.असे टोपे यांनी सांगितले रमण प्रीत यांनी ‘पीआयबीएम’चा प्रवास मांडला. ते म्हणाले, २००७ पासून गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षणाची परंपरा जपली आहे. पाच शैक्षणिक संस्थांतून भारतातील विद्यार्थी येथे उच्च दर्जाचे शिक्षण घेत आहेत.