नागपूर : शिवसेनेला विरोध करण्यासाठी नामांतराला स्थगिती दिली असा आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीसांवर हल्लाबोल चढवला आहे. ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णायाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे.
संजय राऊत सध्या नागपूर दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी नामांतराला स्थगिती देण्याच्या निर्णयावर भाष्य करताना यासंदर्भात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले. त्या निर्णयामध्ये ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील नाव देण्याचा प्रस्तावर मंजुर केला आणि हे तिन्ही निर्णय स्थगित केले असेल तर हे सरकार हिंदूत्वद्रोही आणि महाराष्ट्र द्रोही आहे असा आरोप राऊतांनी यावेळी केला.
काय म्हणाले राऊत?
औरंगाबादचे संभाजीनगर कधी करत आहात हा प्रश्न भाजप करत होते. धाराशीव विषयीही त्यांची तिच भूमिका होती आणि दि. बा. पाटील यांचेनाव द्यावर त्यासाठी हेच लोक मोर्चे काढत होते. उद्धव ठाकरे यांनी केंद्राचा न विचार करात मोठ्या हिंमतीने एका हिंदूत्ववादी भूमिकेतून नामांतराचा निर्णय घेतला.
सरकार घटनाबाहय
जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत. मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार घटनाबा आहे. या सरकारला हे निर्णय फिरवण्याचा अजिबात अधिकार नाही. कारण या सरकारबाबतचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात व्हायचा आहे असे राऊत यांनी यावेळी म्हटले.