24.2 C
Latur
Monday, March 9, 2026
Homeराष्ट्रीय१०० हून अधिक आदिवासी गावांनी थाटली कंपनी

१०० हून अधिक आदिवासी गावांनी थाटली कंपनी

सुमारे १० हजारपेक्षा अधिकांना मिळाला रोजगार बाजारभावापेक्षा २० टक्के दर अधिक

चेन्नई : तामिळनाडूतील निलगिरीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या १०० हून अधिक आदिवासी गावांनी एकत्र येऊन एक कंपनी स्थापन केली आहे. ते आवळा, शिकेकाई, कॉफी, मध आणि जंगलातून मिळणा-या इतर नैसर्गिक वस्तू गोळा करतात आणि कंपनीमार्फत शहरांमध्ये विकतात.

या कंपनीशी या गावांचे १० हजारांहून अधिक लोक जोडले गेले आहेत. यामध्ये त्यांना कीस्टोन फाउंडेशनने मदत केली. फाउंडेशनने स्थानिक लोकांशी मिळून काम सुरू केले. प्रशिक्षण, प्रक्रिया केंद्रे आणि बाजारपेठ तयार करण्याच्या प्रयत्नांतून एक नवीन मॉडेल तयार झाले. २०१३ मध्ये आदिमलाई पझंगुडियिनार प्रोड्यूसर कंपनी लि. ची स्थापना झाली, जी येथील आदिवासी ग्रामीण स्वत: चालवतात. याची उलाढाल १.४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. शेतकरी आणि जंगलातून उत्पादने गोळा करणारे लोक आपला माल कंपनीला देतात, त्यानंतर कंपनी त्यावर प्रक्रिया करून बाजारात पोहोचवते. किंमत ठरवण्यासाठी नियमित बैठकांमध्ये विविध क्षेत्रांचे प्रतिनिधी सहभागी होतात. वस्तूची किंमत बाजारापेक्षा किमान २०% जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. शेतक-यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी वजनासाठी इलेक्ट्रॉनिक तराजू वापरले जातात.

कंपनी बाजारापेक्षा २०% जास्त दराने वस्तू विकते
आदिमलाई कंपनी नीलगिरीतील अनेक गावांना जोडून काम करत आहे. यात एकूण १,८०९ भागधारक आहेत. यापैकी बहुतेक ग्रामीण आणि आदिवासी समुदायातील आहेत, ज्यात सुमारे निम्म्या महिला आहेत. कंपनीच्या गावांमध्ये असलेल्या प्रक्रिया केंद्रांमध्ये मध, आवळा, जांभूळ, कॉफी, बाजरी, काळी मिरी आणि जंगलातून मिळणा-या इतर वस्तू सुकवल्या जातात, पॅक केल्या जातात आणि साठवल्या जातात.

मध गोळा करणा-यांचा अपघात विमा
या गावांमध्ये राहणा-या आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढले आहे आणि स्थलांतर पूर्णपणे थांबले आहे. कंपनी वर्षभराचा नफा भागधारकांमध्ये त्यांच्या योगदानानुसार वाटून देते. धोकादायक ठिकाणी काम करणा-या मध गोळा करणा-यांचा आणि इतर लोकांचा अपघात विमा काढला जातो.

६० कर्मचा-यांपैकी ५२ महिला
याव्यतिरिक्त, कंपनीने महिलांच्या सहभागावर विशेष लक्ष दिले आहे. कंपनीच्या ६० कर्मचा-यांपैकी ५२ महिला आहेत. घरोघरी जाऊन उत्पादने खरेदी करण्याच्या व्यवस्थेने त्या महिलांनाही बाजाराशी जोडले आहे, ज्या बाहेर जाऊ शकत नव्हत्या. आपल्या सामुदायिक मॉडेलसाठी आदिमलाईला इक्वेटर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR