किनवट : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाला किनवट महावितरण कडून केराची टोपली दाखवल्याने शेतक-यांचे शेतातील विज कनेक्शन सर्रास महावितरणच्या अधिका-यांकडुन तोडले जात आहे.
यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे नियंत्रण महावितरणवर नाही का ? कि हे सरकार निष्क्रीय आहे ? कि या सरकार च्या संवेदना संपल्या आहेत असा घणाघाती सवाल करुन शेतक-यांचे विज कनेक्शन तोडु नका अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी केला आहे.