मुझफ्फरनगर: कारखानदाराकडून ऊस खरेदी न झाल्याने नैराश्यातून मुझफ्फरनगरमधील एका शेतकरÞ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर शुक्रवारी संतप्त शेतक-यांनी रस्त्यावर उतरत कारखानदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करून निषेध केला. तर काँग्रेसच्या सरचिटणस प्रियांका गांधी वड्रा यांनी शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून भाजप सरकारवर टीका केली.
शेतामध्ये ऊस वाळून जात असतानाही कारखानदार खरेदीचे नाव घेत नसल्याने सिसोली गावातील ओमपाल सिंग या शेतकºयाने आर्थिक अडचणीतून टोकाचे पाऊल उचलले. याकडे लक्ष वेधताना ऊस उत्पादक शेतक-यांच्या स्थितीकडे प्रियांका यांनी बोट ठेवले. कारखानदारांकडून पैसे मिळत नसल्याने ऊस उत्पादक आर्थिक विवंचनेत आहे. मात्र, तरीही सरकार गप्प का, असा प्रश्न त्यांनी केला.
Read More हत्तीणीनंतर गायीला घातले स्फोटके खायला
ऊसखरेदी होत नसल्याने ओमपाल यांना नैराश्य आले होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात माहिती देताना सांगितले. मात्र, अधिका-यांनी आत्महत्येमागे हे कारण नसल्याचे म्हणत चौकशी करणार असल्याचे सांगितले. जमिनीच्या घरगुती वादातून त्याने हे कृत्य केल्याचा दावा अधिकाºयांनी केला. ऊस खरेदी थांबवलेली नाही, असे जिल्हा दंडाधिकारी सेवलकुमारी जे. यांनी म्हटले आहे.
संतप्त निदर्शने
घटनेनंतर कारखानदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. राष्ट्रीय लोकदलचे राष्ट्रीय सचिव राजपाल बल्यान आणि माजी मंत्री योगराज सिंग यांनीही निदर्शने केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि मुझफ्फरनगरचे खासदार संजीव बल्यान यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले.