बिकानेर : राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात सरकारी नोकरीसाठी ५ महिन्यांच्या मुलीला कालव्यात फेकल्याची घटना घडली. संतापजनक म्हणजे या कोवळ््या मुलीला तिच्या आई-वडिलांनीच सरकारी नोकरी वाचवण्यासाठी कालव्यात फेकले.
वडील झंवरलाल यांनी कंत्राटी नोकरी वाचवण्यासाठी आपली मुलगी अंशिका उर्फ अंशुला ठार मारले. पोलिसांनी आरोपी आई-वडिलांच्या मुसक्या आवळल्या आहेत.