कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र, तत्पूर्वी तृणमूल काँग्रेस अध्यक्ष व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला आहे. दोन दिवसांपुर्वी त्यांनी भाजपविरोधात डावी आघाडी, काँग्रेस व तृणमूलची आघाडी होणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. मात्र आज त्यांना धक्का देत डावी आघाडी, काँग्रेस यांनी ममतांविना एकत्र होत आघाडी करुन निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.
पश्चिम बंगालला धार्मिक ध्रुवीकरणापासून वाचवण्यासाठी आम्ही भाजपा व टीएमसीविरोधात मिळून निवडणूक लढवू. आमच्यात (काँग्रेस व डावी आघाडी) कोणतेही गैरसमज नाहीत. जागा वाटपांवर अद्याप चर्चा बाकी आहे, असे डाव्या आघाडीचे अध्यक्ष बिमेन बोस यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे या अगोदर ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेस व डाव्या पक्षांकडे मदत मागितली होती. मात्र, दोघांनी यासाठी स्पष्टपणे नकार दिला होता. तर, काँग्रेसच्या एक नेत्याने ममता बॅनर्जींना आघाडी करण्यापेक्षा टीएमसीचे काँग्रेसमध्ये विलनीकरण करण्याचाही सल्ला दिला होता. आता डाव्या पक्षांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केल्याने, ममता बॅनर्जींना बंगालमधील आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.
ममता बॅनर्जींची डोकेदुखी वाढली
यंदाची निवडणुक ममता बॅनर्जींना फारच कठीण जाण्याची चिन्हे आहेत. भाजपने आपला जनाधार वाढविण्यासाठी तृणमुल काँग्रेसमधील अनेक राजकीय दिग्गजांना फोडून पक्षात प्रवेश दिला आहे. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाने जेरीस आलेल्या ममता बॅनर्जींनी भाजपविरोधात काँग्रेस, डावे व तृणमुल यांची आघाडी व्हावी, असे दोन्ही पक्षांना आवाहन केले होते. मात्र दोन्ही पक्षांनी त्यांना डावलल्याने त्यांची डोकेदुखी आता अधिकच वाढली आ
सोलापूर शहर जिल्ह्यात लसीकरणास सुरुवात