नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात बदल घडवणा-या देशातील ४ शेतक-यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
यामध्ये देशातील चार शेतक-यांना हा मानाचा सन्मान जाहीर झाला आहे. या शेतक-यांनी शेती क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यात केंद्र सरकारने सिक्कीम, ओडिशा, केरळ आणि हिमाचल प्रदेशमधील प्रत्येकी एका शेतक-याला पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.