नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या सैनिक भरती योजनेत काही बदल केले जाऊ शकतात. सध्या सैन्यात अंदाजे १.८ लाख सैनिकांची कमतरता असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, लष्कराने अग्निवीरांची भरती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या, ४५,००० ते ५०,००० सैनिकांची वार्षिक भरती १,००,००० पर्यंत वाढवली जाऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२०-२१ मध्ये जेव्हा कोविड-१९ साथीचा आजार आला तेव्हा सैन्याने भरती थांबवली. या दोन वर्षांत अंदाजे १,२०,००० ते १,३०,००० सैनिक निवृत्त झाले आहेत. हे २०२२ मध्ये अग्निपथ योजना सुरू होण्यापूर्वीचे होते. त्यामुळे निवृत्तीमुळे झालेली पोकळी भरून काढता आली नाही.
सैन्याच्या कमतेचे कारण काय?
ज्यावेळी अग्निवीर योजना सुरू करण्यात येणार होती. त्यावेळी पुढील चार वर्षांत सैन्यात अग्निवीरांची भरती हळूहळू वाढवण्याचे नियोजन होते. याची मर्यादा १.७५ लाख होती. नौदल आणि हवाई दलातील भरतीची आकडेवारीही पुढील चार वर्षांत हळूहळू अंदाजे २८,७०० पर्यंत वाढवायची होती. अग्निवीर योजनेसह, २०२२ मध्ये कमी संख्येने सैनिकांसह भरती सुरू झाली.
निवृत्त होणा-या सैनिकांची संख्या दरवर्षी ६०,०००-६५,००० इतकीच राहिली, यामुळे दरवर्षी २०,०००-२५,००० अतिरिक्त सैनिक येत आहेत. सध्या, एकूण कमतरता अंदाजे १.८ लाख सैनिकांची आहे. लष्कर आता अग्निवीरांच्या भरतीसाठी दरवर्षी अंदाजे १,००,००० अधिक रिक्त पदांसाठी भरती करण्याची शक्यता आहे.

