अहमदाबाद : विमानात सव्वा लाख लिटर इंधन असल्याने स्फोटानंतर तापमान अती वाढल्याने कोणालाच वाचवण्याची संधी मिळाली नसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.
शहा म्हणाले की या घटनेने संपूर्ण देश स्तब्ध आहे असे म्हटले. संपूर्ण देश एकसाथ आणि संवेदनांसह दुर्भाग्यपूर्ण दुर्घटनेत ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. अमित शाह म्हणाले की, भारत सरकार, गुजरात सरकार, भारताचे पंतप्रधान यांच्यावतीने ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. अमित शाह म्हणाले, अपघातानंतर १० मिनिटात भारत सरकारला माहिती मिळाली. तातडीने मी मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहविभागाचे नियंत्रण कक्ष, नागरी उड्डयण मंंत्री, नागरी उड्डयण विभाग सर्वांसोबत चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन लगेच आला होता, असे अमित शहा यांनी सांगितले. भारत सरकार, गुजरात सरकार आणि सर्व विभाग मदत कार्य आणि बचाव कार्य करत आहेत. या विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर होते. यापैकी एक प्रवाशी वाचल्याची माहिती समोर आली आहे. त्याला भेटून आलो आहे. मृत्यूंची संख्या डीएनए परिक्षण आणि प्रवाशांची ओळख पटवल्यानंतर प्रशासन अधिकृतपणे जाहीर करेल, अशी माहिती देखील अमित शहा यांनी दिली.
कुणालाही वाचवण्याची संधीच मिळाली नाही
घटनेनंतर तातडीने गुजरात सरकारने आपत्ती व्यवस्थापनांच्या सर्व विभागांना अलर्ट केले. आरोग्य विभाग, फायर ब्रिगेड, पोलिस विभाग असो भारत सरकारच्या सीएपीएफला संपर्क करुन सर्वांनी एकत्र मिळून मदत कार्य आणि बचाव कार्य केले. सव्वा लाख लिटर इंधन विमानात होते. तापमान इतके वाढले की कुणालाही वाचवण्याची संधी मिळाली नाही. मी घटनास्थळावर जाऊन आलो आहे, असेही अमित शाह यांनी सांगितले.
डीएनएची कारवाई पूर्ण
सर्व प्रवाशांच्या मृतदेहाला बाहेर काढण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. ज्या प्रवाशांचे नातेवाईक इथं पोहोचले आहेत त्यांचे डीएनए घेण्याचे काम दोन तीन तासांत पूर्ण होईल. विदेशात ज्यांचे नातेवाईक आहेत त्यांना माहिती देण्याचे काम झाले आहे. ते जेव्हा पोहोचतील तेव्हा डीएनए घेतले जातील असे अमित शाह म्हणाले. जितके मृतदेह मिळाले आहेत, त्यांचे डीएनए नमुने घेण्याची कारवाई पूर्ण झाली आहे.
१००० डीएनए टेस्ट कराव्या लागणार
गुजरातमध्ये १००० डीएनए टेस्ट कराव्या लागतील. याची सुविधा गुजरातमध्ये आहे. त्यासाठी दुस-या राज्यात जावे लागणार नाही. एफएसएल आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठ दोन्ही संस्था कमी वेळात डीएनए परिक्षण पूर्ण करतील. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांना दिले जातील. नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था इतर व्यवस्था योग्यपणे करण्यात आली आहे. आढावा बैठकीत याबाबत माहिती घेण्यात आली आहे, अशी माहिती अमित शाह यांनी दिली.
चौकशी सुरू
नागरी उड्डयण विभागाने चौकशी सुरु केली आहे. या विभागाच्या मंर्त्यांनी योग्यप्रकारे चौकशी व्हावी, अशा सूचना केल्या आहेत, असे अमित शाह म्हणाले. हा अपघात आहे, अपघाताल कोणी रोखू शकत नाही. परंतु ३६५ दिवस २४ तास अशा प्रकारच्या घटनांवेळी प्रशासनाच्या तत्परतेची कसोटी होते. गुजरातच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या तत्परतेची कसोटी दुर्भाग्यपूर्ण स्थितीत झाली ते सर्वांसमोर आले असें अमित शाह म्हणाले.