कळंब (सतीश टोणगे ) : मांजरा धरण रविवारी सायंकाळपर्यंत 96% भरले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार धरणक्षेञात एखादा मोठ्ठा पाऊस पडला, तर हे धरण कोणत्याही क्षणी 100% भरू शकते. त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे दरवाजे उघडावे लागू शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन मांजरा नदी काठावरील शेतकरी, ग्रामस्थांनी सतर्क रहावे. नदीपाञात पोहणे, नदीकाठावर जनावरे बांधणे किंवा चारण्यास नेणे टाळावे.
तसेच धरणाचे दरवाजे उघडल्यास ते पाहण्यासाठी जाणे, पाण्याच्या प्रवाहात उतरणे असे प्रकार नागरीकांनी करू नयेत. त्याचबरोबर एखाद्या पुलावरून पाणी वाहत असल्यास त्यातून वाहन नेणे, पूल ओलांडणे टाळावे. संभाव्य पाऊस, पूरपरीस्थिती लक्षात घेऊन आपण सतर्क रहावे, तसेच इतरांनाही सतर्क करावे.असे आवाहन लातुरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,जी. श्रीकांत , कार्यकारी अभियंता एस.एस. आवटे उस्मानाबाद यांनी यांनी केले आहे.
मांजरा प्रकल्प
एकूण साठा 214.370 दलघमी
उपयुक्त साठा 214.370 दलघमी
पाणी पातळी 642.16 मी
एकूण साठा 95.66 %
उपयुक्त साठा 94.51%
प्रकल्पीय एकूण साठा 224.09 दलघमी
उपयुक्त साठा 176.96 दलघमी
मृत साठा 47.130 दलघमी
पूर्ण संचय पातळी 642.37 मी
नोकरदारांसाठी नवा महागाई निर्देशांक; महागाई भत्त्याची सवलत ठरवणे होणार सोपे