नवी दिल्ली/मुंबई : इराण आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाबाबत भारत सरकार हाय अलर्टवर आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून खबरदारी घेण्याचे आवाहन केल्याचे वृत्त आहे. या पत्रातून सांप्रदायिक हिंसाचाराच्या शक्यतेबद्दल सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतर, भारतातील अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू झाली.
परदेशातील घटनांचा देशात परिणाम होऊ शकतो. त्यात विशेषत: धार्मिक मेळाव्यांमध्ये होणा-या वक्तृत्वाचा उल्लेख करण्यात आला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा बिघाड रोखण्यासाठी जलद गुप्तचर माहिती सामायिक करण्याची आणि वेळेवर कारवाई करण्याची गरज या पत्रात अधोरेखित करण्यात आली होती.
प्रक्षोभक भाषणे देण्या-यांवर लक्ष
गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, प्रक्षोभक भाषणे देणा-या इराण समर्थक धर्मोपदेशकांना ओळखण्यास आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. वृत्तसंस्था एएनआयनुसार, दिल्लीतील अधिका-यांना अशीही चिंता आहे की अतिरेकी घटक स्थानिक पातळीवर तणाव वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय घटनांचा फायदा घेऊ शकतात. सरकारी सल्लागारात भाषणे आणि विधानांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.
इराण अमेरिकेशी वाटाघाटी करणार नाही
एका वरिष्ठ इराणी सुरक्षा अधिका-याने सांगितले की ते वॉशिंग्टनशी वाटाघाटी करणार नाहीत. अमेरिका इराणच्या नवीन नेतृत्वाशी बोलण्यास तयार आहेत, असे संकेत ट्रम्प यांनी दिले. इराणचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांनी एक्सवर लिहिले की आम्ही अमेरिकेशी वाटाघाटी करणार नाही. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर, अमेरिका आणि इस्रायलने रविवारी इराणमधील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात हल्ले केले, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तळांवर बॉम्बहल्ला केला आणि युद्धनौका नष्ट केल्या. इराणी नेत्यांच्या मते, हल्ले सुरू झाल्यापासून खामेनी आणि इतर वरिष्ठ नेत्यांसह २०० हून अधिक लोक मारले आहेत.

