34.3 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeक्रीडाटीम इंडियाचा सामना पावसामुळे रद्द

टीम इंडियाचा सामना पावसामुळे रद्द

जोहान्सबर्ग : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. अशातच आता क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा सामना रद्द झाला आहे. पावसामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये हा सामना आयोजित करण्यात आला होता. मात्र पावसामुळे टॉसही होऊ शकला नाही.

दक्षिण आफ्रिकेत अंडर १९ ट्राय सीरिजचे आयोजन करण्यात आले होते. या ट्राय सीरिजमध्ये टीम इंडिया, अफगाणिस्तान आणि यजमान दक्षिण आफ्रिका अशा ३ संघांचा समावेश होता. टीम इंडिया या मालिकेतील पाचवा सामना जिंकून थेट अंतिम फेरीत पोहोचली. तर दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला पराभूत करत फायनलचे तिकिट मिळवले.

त्यानंतर १० जानेवारी रोजी टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना होणार होता. मात्र पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने सामना होऊ शकला नाही. परिणामी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेला संयुक्तरीत्या विजेता घोषित करण्यात आले. बीसीसीआयने सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबाबतची माहिती क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR