तिरुवनंतपुरम: केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने (UDF) देदीप्यमान यश संपादन केल्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळच्या जनतेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. या विजयाला त्यांनी “सत्य आणि प्रगतीचा विजय” असे संबोधले आहे.
Thank you to my brothers and sisters in Keralam for a truly decisive mandate.
Congratulations to every UDF leader and worker for a hard-fought, well-run campaign.
As I said before, Keralam has the talent, Keralam has the potential and now Keralam has a UDF government with a…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 4, 2026
निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “माझ्या केरळमधील सर्व बंधू-भगिनींचे मनापासून आभार. तुम्ही दिलेला हा कौल अत्यंत निर्णायक आहे. केरळमध्ये प्रचंड टॅलेंट आणि क्षमता आहे, आता युडीएफचे सरकार या क्षमतेचा राज्याच्या विकासासाठी पूर्ण वापर करेल.”
राहुल गांधी यांनी केवळ मतदारांचेच नव्हे, तर भर उन्हात आणि प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या काँग्रेस व युडीएफच्या कार्यकर्त्यांचेही कौतुक केले. “हा विजय प्रत्येक त्या कार्यकर्त्याचा आहे ज्याने तळागाळात जाऊन आमची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवली. आपण सर्वांनी मिळून एक अतिशय चांगली आणि सकारात्मक निवडणूक मोहीम राबवली,” असे त्यांनी नमूद केले.

