25.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeक्रीडाभारत सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सज्ज

भारत सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सज्ज

बांलगादेशसाठी ‘करो या मरो’ ची लढत

नवी दिल्ली : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाला आहे. टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात आज सुपर ८ फेरीतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्याला रात्री ८ वाजता सुरुवात होणार आहे. तर ७ वाजून ३० मिनिटांनी टॉस होणार आहे. टीम इंडियाने सुपर ८ मधील पहिला सामना जिंकल्याने भारतीय संघ उत्साहात असून, आजच्या सामन्यात भारताला विजय मिळवून उपान्त्य फेरी गाठण्याची संधी आहे तर दुसरीकडे सुपर ८ मधील पहिला सामना गमावल्याने आता बांगलादेशची ‘करो या मरो’अशी स्थिती आहे.

टीम इंडिया या स्पर्धेत अजिंक्य आहे. टीम इंडियाने साखळी फेरीतील ३ सामने जिंकले, तर १ सामना पावसामुळे रद्द झाला. तर दुस-या बाजूला बांगलादेशने ३ सामने जिंकले. तर एका सामन्यात पराभव झाला. त्यानंतर टीम इंडियाने सुपर ८ मधील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला धूळ चारली. बांगलादेशला सुपर ८ मधील आव्हान कायम ठेवायचे असेल, तर कोणत्याही परिस्थितीत टीम इंडियाविरुद्ध जिंकावे लागणार आहे. तर भारतीय संघाला या विजयासह उपान्त्य फेरीचे तिकिट मिळवायचे आहे. यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR