27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रमुलीने प्रेमविवाह केल्याचा राग धरत वडिलांनी जावयाचा केला खून

मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग धरत वडिलांनी जावयाचा केला खून

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील व चुलत भावाने जावयावर चाकूने गंभीर वार करून हत्येचा प्रयत्न केला होता. इंदिरानगरमध्ये १४ जुलै रोजी घडलेल्या घटनेत अमित मुरलीधर साळुंके (२५) हा तरुण गंभीर जखमी झाला होता.
पोट व छातीत खोलवर वार झाल्याने गुरुवारी अमितचा घाटीच्या अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

खासगी कंपनीत काम करणा-या अमितचे लहानपणीची मैत्रीण विद्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, भिन्न धर्मामुळे विद्याच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नास विरोध होता. विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केले. अमितच्या कुटुंबाने दोघांना स्वीकारल्याने २ मे रोजी ते घरी परतले. त्यानंतर त्यांचा गुण्यागोविंदाने संसार सुरू होता. मात्र, विद्याच्या कुटुंबाच्या मनातला राग गेला नव्हता.

विद्याचे वडील गीताराम भास्कर कीर्तिशाही व चुलत भाऊ आप्पासाहेब अशोक कीर्तिशाही हे सतत अमितला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. १४ जुलै रोजी अमित परिसरात फिरत असताना गीताराम व आप्पासाहेबने त्याच्यावर चाकूने गंभीर वार केले. तेव्हापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी अमितची मृत्यूशी झुंज अखेर संपली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR