परभणी : परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील रस्ते, नाली आणि स्वच्छतेच्या प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक झाले असून रस्त्यावर झाडे लावून गुलाबाचा हार घालीत आंदोलन करण्यात आले. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाचे सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी आंदोलक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख प्रभाकर कदम यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रस्ते, नाली, पाणी आणि स्वच्छतेच्या प्रश्नावरून आक्रमण होत आंदोल केले.
पावसामुळे रस्त्यावर चिखल साचत असल्याने नागरिकांना पायी चालणे देखील कठीण झाले आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी चिखलात घसरून पडत आहेत.
पिण्याचे पाणी नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. जागोजागी कच-याचे ढीग साचले असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी चक्क रस्त्यावर झाडे लावून त्याला गुलाबाचा हार घातला. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत विषयी संताप व्यक्त केला.
यावेळी मुंजाजी सामाले, संतोष सामाले, निलेश देशमुख, नागरगाव भाले, मधुकर देशमुख, सचिन फूके, गजानन गलांडे, दत्तराव लिंगायत, नवनाथ कदम, गोपाळ फुके, दिगंबर गलांडे, संतोष शिरसागर, दिगंबर बनसोडे, हनुमान कदम आदी गावकरी उपस्थित होते.