23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरशाहू महाविद्यालयाचे उज्ज्वल यश

शाहू महाविद्यालयाचे उज्ज्वल यश

लातूर : प्रतिनिधी
इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल दि. २१ मे रोजी जाहीर झाला. यात येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्­ज­वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी विज्ञान शाखेत एकूण १०६२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती त्यापैकी १०६२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के आहे.
तसेच वाणिज्­य शाखेत ४७१ परीक्षार्थ्यांंपैकी ४५८ उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्­य शाखेचा निकाल ९७.२३ टक्­के आहे. कला शाखेत २६० परीक्षार्थ्यांपैकी२४३ उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल ९३.४६ टक्­के आहे. एच. एस. सी. व्­होकेशनल शाखेचा निकाल ९३.३३ टक्­के आहे. लातूर विभागातून विज्ञान शाखेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ९७.८१ टक्के आहे. या तुलनेत महाविद्यालयाचे उत्­तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण २.१९ टक्­के जास्­त आहे.  धिरज राघोबा सोमवंशी हा विद्यार्थी ९५ टक्­के गुण मिळवुन महाविद्यालयात सर्वप्रथम आला. कु. सृष्­टी सुदर्शन बोटवे हिने ९३.३३ टक्­के गुण मिळवुन दुसरे स्­थान  प्राप्­त केले तर श्रीया श्­यामसुंदर  देव ही विद्यार्थिनी ९२.८३ टक्­के  गुण प्राप्­त करून सर्वतृतीय आली आहे.
जाहीर झालेल्­या निकालानुसार एकूण २० विद्यार्थ्यांना ९० टक्­क्­यांपेक्षा जास्­त गुण मिळाले, २२९ विद्यार्थ्यांना ८० टक्­क्­यांपेक्षा जास्­त गुण तर ४३१ विद्यार्थी ७५ टक्­क्­यांपेक्षा अधिक गुण मिळवून विशेष प्राविण्­यासह उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्­य शाखेत आशिष भुतडा हा विद्यार्थी ९६.८३ टक्­के गुण घेऊन महाविद्यालयातून सर्वप्रथम आला आहे. तर हर्ष बिलोलीकर हा विद्यार्थी ९६.६७ टक्­के गुण घेऊन द्वितीय तसेच खुशी अग्रवाल व समर्थ कोळी हे दोन विद्यार्थी ९६.१७ टक्­के गुणांसह तृतीय स्­थानी आहेत. वाणिज्­य शाखेतून एकूण ४४ विद्यार्थ्यांनी ९० टक्­क्­यांपेक्षा जास्­त गुण घेतले आहेत. तसेच १९६ विद्यार्थी विशेष प्राविण्­यासह उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागातून वाणिज्­य शाखेच्या उत्तीर्ण  विद्यार्थ्यांचे प्रमाण ९२.३१ टक्के आहे. या तुलनेत महाविद्यालयाचे उत्तीर्ण  विद्यार्थ्यांचे प्रमाण ४.९२ टक्­के जास्­त आहे. या महाविद्यालयामधून कला, वाणिज्­य व विज्ञान शाखेतून १०० पैकी १०० गुण घेणारे संस्­कृत-३०, पुस्­तपालन व लेखाकर्म-२१, गणित – ०९, पाली-०३, रशियन- ०१, अर्थशास्­त्र०१ व ए. एस. टी. (क्रॉप प्रॉडक्­शन)-०२ विद्यार्थी आहेत. एच.एस.सी. व्­होकेशनल शाखेतून कादरी आसीफ हा विद्यार्थी ७७.६७ टक्­के गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम आला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सहसचिव गोपाळ शिंदे, सहसचिव अ‍ॅड. सुनिल सोनवणे, माजी प्राचार्य डॉ. आर. एल. कावळे व इतर सर्व संस्­थेचे संचालक, सीईटी-सेल शालेय समिती अध्यक्ष डॉ. सुहास गोरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य प्रा. एस. एन. शिंदे, सीईटी- सेलचे संचालक प्रा. दिलीप देशमुख, पर्यवेक्षक प्रा. जयराज गंगणे व प्रा. सोमदेव शिंदे तसेच इतर सर्व मुख्­य समन्वयक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR