22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयअखिलेश यादव न्याय यात्रेत

अखिलेश यादव न्याय यात्रेत

भाजपा हटाओ संकट मिटाओचा नारा

आग्रा : वृत्तसंस्था
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव काँग्रेसच्या भारत जोडो न्याया यात्रेत सहभागी झाले. गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांत जागावाटपावर चर्चा चालू होती. मात्र या चर्चेतून ठोस असा तोडगा निघत नव्हता. मात्र शुक्रवारी जागावाटपाच्या चर्चेवर या दोन्ही पक्षांत सहमती झाली. त्यानंतर अखिलेश यादव यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील या यात्रेत सहभाग नोंदवला. ही यात्रा सध्या उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे आहे.

काही दिवसांपूर्वी जागावाटपावरील चर्चेत ठोस तोडगा न निघाल्यामुळे समाजवादी आणि काँग्रेस यांच्यातील वाद टोकाला गेला होता. त्यानंतर अखिलेश यादव यांनी सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे संकेत दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून अखिलेश यांनी काही जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते. मात्र आता जागावाटपावर सहमती झाल्यानंतरच अखिलेश यादव यांनी न्याय यात्रेत हजेरी लावली.

रविवारी अखिलेश या यात्रेत सहभागी झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर यात्रेमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी एकत्र सेल्फी घेतले. यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव अशा तिघांनीही यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी या नेत्यांनी प्रचंड जनसमुदायाला संबोधित केले. आगामी निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवायचे आहे. त्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

संविधान वाचवा,
भाजप हटवाचा नारा
दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हेही उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये पोहोचले. राहुल गांधींच्या दौ-यातही अखिलेश यांचा जलवा दिसून आला. सपाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते म्हणाले की, आमचा लढा संविधान वाचवा, भाजप हटवा आणि देश वाचवा. आमचा लढा तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR