29.2 C
Latur
Saturday, June 29, 2024
Homeमहाराष्ट्रजनतेने नाकारलेल्या महायुती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन

जनतेने नाकारलेल्या महायुती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकार आता पावसाळी अधिवेशनाला सामोरे जाणार आहे. अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षाने सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील त्यांच्या फुगलेल्या छातीची हवा काढण्याचे काम जनतेने केले आहे, त्यांचे विशेष अभिनंदन आहे. जनाधार गमवलेल्या या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीला काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते सतेज पाटील, भाई जगताप, राजेश राठोड, राष्ट्रवादी (शरद पवार) अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उद्धव ठाकरे) अंबादास दानवे, शेकाप जयंत पाटील, सपा अबू आझमी उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत वडेट्टीवार म्हणाले, महायुतीने राज्याला खड्ड्यात घातले आहे, हे अनैतिक संगत असलेले सरकार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील त्यांच्या फुगलेल्या छातीची हवा काढण्याचे काम जनतेने केले त्यांचे विशेष अभिनंदन आहे. जनाधार गमवलेल्या या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. तिन्ही पक्षांची अवस्था महाराष्ट्राने पाहिली.
भाजपने दोन वर्षांपूर्वी लोकशाहीचा गळा घोटळा हे जनतेने पाहिले. लोकसभेच्या माध्यमातून त्यांनी हुकूमशाही चालणार नाही हे दाखवून दिले. हा संदेश आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दाखवून दिला. हे जुमलेबाजी करणारे सरकार आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

शेतक-यांचा विश्वासघात
सरकारने दीडपटीने हमी भाव दिला नाही. जो हमीभाव २०१९ ला मिळत होता तोच हमीभाव आता देत असेल तर त्यांनी लोकांना धोका दिला आहे. शेतक-यांचा विश्वासघात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी केला आहे. शेतीच्या अवजारे, बियाणे, खतांवर जीएसटी लावते आणि हेलिकॉप्टर, हिरे स्वस्त केले आहेत. यांनी तर मरणानंतर अन्त्यसंस्कारासाठी लागणा-या साहित्यावरही जीएसटी लावली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

घोटाळेबाज सरकार
५० किलोच्या युरीयाच्या बॅगवर ५० रुपयांची वाढ केली पण युरीयाचे वजन मात्र ४० किलो केले. कांदा निर्यात नाकारली जाते. केंद्रातले सरकार शेतकरीविरोधी आहे. आणि इथले नेते त्याला समर्थन देतात. हे त्रिकुटाचे घोटाळेबाज, टेंडरबाज सरकार आहे. दलालांना प्रत्येक मजल्यावर केबिन दिली. तिथे ते तोडपाणी करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR