22.2 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप पराभवाच्या भीतीने पंतप्रधान मोदींना प्रत्येक गल्लीबोळात फिरवत आहे

भाजप पराभवाच्या भीतीने पंतप्रधान मोदींना प्रत्येक गल्लीबोळात फिरवत आहे

मुंबई : महाविकास आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रस्त्यावर आणलय. भाजप पराभवाच्या भीतीने पंतप्रधान मोदींना प्रत्येक गल्लीबोळात फिरवत आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी आज सत्ताधा-यांना लगावला. पंतप्रधान मोदींचा आज मुंबईत रोड शो होणार आहे. या संदर्भात माध्यमांशी त्यांना विचारले असता राऊतांनी मोदींना रोड शो शिवाय दुसरे काय काम नाही ? असा सवालही उपस्थित केला.

महाराष्ट्रातील जणतेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करायचे ठरवले आहे. गावागावातून उमेदवार कोणी असो, मोदी नको अशा घोषणा देण्यात येत आहेत. आतापर्यंत ज्या ठिकाणी मतदान झाले आहे त्या ठिाणी ९० टक्के जागा महाविकास आघाडीला मिळणार आहेत. तर मुंबईत सर्व ६ जागा आम्ही जिंकू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींना मुंबईत ठाण मांडून बसाव लागतय. तुमच्यावर दररोज भटकण्याची ही वेळ का आली असा सवालही त्यांनी मोदींना केला.

मोदीं जिथे जातील तिथे होईल भाजपचा पराभव

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात रोड शो करतात, त्यांना रोड शो शिवाय दुसरं काम नाही का? मोदीं मणिपूरला गेले नाहीत. जम्मूमध्ये काश्मिरी पंडितांचे अश्रू पुसायला गेले नाहीत. घाटकोपरला १८ लोकांचे मृतदेह सापडलेत, त्यांच्याविषयी संवेदना नाही. आज तिथे जाऊन नाटक करतील. मोदी महाराष्ट्रात जिथे जातील, तिथे भाजपचा पराभव होणार आहे. मोदीं देशभरात रोड शो करतात आज मुंबईत रोड शो करणार आहेत, त्यांना रोड शो शिवाय दुसरे काम नाही, असेही राऊत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR