24.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रपरीक्षांमध्ये सातत्याने गैरप्रकार

परीक्षांमध्ये सातत्याने गैरप्रकार

मुंबई : राज्य सरकारमधील विविध विभागांद्वारे शासकीय नोकर भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येते. मात्र या परीक्षांमध्ये सातत्याने गैरप्रकार होताना दिसतात. याविरोधात विद्यार्थी आंदोलन करतात, परीक्षा रद्द करण्याची मागणी करतात, मात्र, सरकार पुरावे द्या, चौकशी करू अशी भूमिका घेते.
दरम्यान, बुधवारी, २१ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा अमरावतीत परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला. मृद आणि जलसंधारण विभागाच्या या परीक्षेत अधिकारीच विद्यार्थ्यांना उत्तरे पुरवत असल्याचे लक्षात आले. यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी, वारंवार अशाच गोष्टी घडत असतील तर सरकारही या गैरप्रकारांमध्ये सहभागी आहे, हेच पुन्हा सिद्ध झाले, असे म्हणत सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी एक्स (पूर्वीचे ट्वीटर) वर ट्वीट करत टीका केली आहे.

अनेकदा सांगूनही हे गोंधळलेलं सरकार पेपरफुटीच्या घटनांना गांभीर्याने घ्यायला तयार नाही. ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाले त्या ठिकाणी सेंटर्स देऊ नका अशी वारंवार मागणी करूनही घमंडी सरकार कार्यवाही करत नसेल आणि त्याच सेंटर्सवर परीक्षा घेत असेल तर सरकारही या गैरप्रकारांमध्ये सहभागी आहे, हेच आज पुन्हा सिद्ध झाले.

आज अमरावतीत गैरप्रकार घडला, उद्या दुसरीकडे घडेल, पण हे सरकार काहीही कारवाई करणार नाही. हे सरकार विद्यार्थ्यांना गृहीत धरून चाललंय. पेपरफुटी विरोधातील या लढ्यात मी तर सोबत आहेच पण आता विद्यार्थ्यांना स्वत:ही लढा उभारावा लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR