22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
HomeFeaturedभाजपच्या ‘डॅमेज कंट्रोल’साठी मंत्रिमंडळ विस्ताराचा उतारा!

भाजपच्या ‘डॅमेज कंट्रोल’साठी मंत्रिमंडळ विस्ताराचा उतारा!

केंद्रातील सत्ता स्थापनेनंतर महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार

मुंबई : विशेष प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत एनडीला बहुमत मिळाले असले तरी भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार करून डॅमेज कंट्रोल केले जाण्याची शक्यता आहे. राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. केंद्रातील सत्तास्थापनेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे.

महायुतीतील शिंदे सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांनी हा दावा केला आहे. कॅबिनेटचा विस्तार महाराष्ट्रात करावाच लागेल, एक लिमिट असते. तुम्ही पूर्ण कॅबिनेट बनवू शकले नाहीत हा शिक्का राहील, त्यामुळे अधिवेशनापूर्वी मंत्री मंडळाचा हा विस्तार होईल. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ग्रीन सिग्नल दिला, असेही शिरसाट म्हणाले. आगामी विधान सभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राज्याच्या मंत्रिमंडळात विस्तार होणार आहे, असे वृत्त आहे.

यांसदर्भातच संजय शिरसाट यांनीही भाष्य करत लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीही ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा केला आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला केवळ अवघ्या १७ जागा मिळाल्या, भाजपचीही पिछेहाट झाली. याची कारणमीमांसा करताना संजय शिरसाट यांनी आम्हाला ओव्हर कॉन्फिडन्सचा फटका बसल्याचे स्पष्ट मत मांडले. सर्व्हे, जागा वाटपात दिरंगाई झाली त्याचाही फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. ग्राऊंड लेव्हलला कार्यकर्त्याला महत्व देणे गरजेचे असून ज्या गोष्टी राहिल्या त्याची उणीव विधानसभेत भरून काढू असे शिरसाट यांनी सांगितले. सतराचा खतरा वाटत नाही, ताक फुंकून पिऊ, दुध गरम होतं आम्ही ताक समजून पीत होतो. पण मतदारांना गृहीत धरणे चुकीचे आहे, मतदार जागा दाखवतो, असे शिरसाट म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR