22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeक्रीडाभारताचा दमदार विजय, मालिकेत आघाडी

भारताचा दमदार विजय, मालिकेत आघाडी

हरारे : वृत्तसंस्था
भारतीय संघाने झिम्बाब्वेचे वस्त्रहरण करत चौथा सामना सहजपणे जिंकला. या सामन्यात झिम्बाब्वेने भारतापुढे १५३ धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघाने एकही विकेट न गमावता हे आव्हान पूर्ण केले. या विजयासह भारताने ही मालिकाही जिंकली. कारण या मालिकेत भारताने सलग तीन सामने जिंकले. त्यामुळे ५ सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आणि मालिकाही जिंकली.

या सामन्यात यशस्वी जैस्वालने तुफानी फटकेबाजी करत नाबाद ९३ धावांची दमदार खेळी साकारली तर शुभमन गिलने नाबाद ५८ धावा करत त्याला चांगली साथ दिली. भारताने यावेळी १० विकेट्स राखत झिम्बाब्वेवर सहजपणे विजय साकारला.झिम्बाब्वेच्या १५३ धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालने दणक्यात सुरुवात केली. आपल्याला टी-२० वर्ल्ड कपमध्ये संधी दिली असती तर दमदार सलामी देऊ शकलो असतो, हे यशस्वीने दाखवून दिले. यशस्वीने धडाकेबाज फटकेबाजी करत झिम्बाब्वेची गोलंदाजी निष्प्रभ करून टाकली. त्यामुळेच भारताला या सामन्यात दणदणीत विजय मिळवता आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR