22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूर१४४ धरणांपेक्षा बराजमध्ये अधिक पाणी साठा

१४४ धरणांपेक्षा बराजमध्ये अधिक पाणी साठा

लातूर : एजाज शेख
मांजरेच्या वाहत्या पाण्याला दूथडी अडवून उभय तिरावरील तृषार्त भूमीला सुजलाम् सुफलाम् करण्याचे अभिनव स्वप्न विकासरत्न विलासराव देशमुख यांनी पाहिले आणि ते स्वप्न साकारले केल्याने मांजरा नदीवरील बराज आजघडीला शेतक-यांसाठी शाश्वत स्त्रोत बनले आहेत. मांजरा, तेरणा व रेणा नद्यांवरील एकुण २७ बराजमध्य उपयुक्त पाणीसाठा ३५.०३५ दशलक्षघनमीटर लघमी म्हणजेच ४५.२ टक्के पाणी साठले आहे. तर जिल्ह्यातील एकुण १४४ धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ६०.५८६ दलघमी पाणीसाठा असुन त्याची टक्केवारी केवळ ८.६० एवढी आहे.

विकासरत्न विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी लातूर शहर व परिसरातील पाणीपुरवठा योजनेसाठी शाश्वत स्त्रोताच्या निश्चितीकरणासाठी उच्चाधिकारी समितीची नियुक्ती केली होती. उच्चाधिकार समितीने मांजरा नदीवर मांजरा धरणाच्या खालील बाजूस १००.०३ दलघमी पाणी उपलब्ध केल्यानूसार बोरगाव-अंजनपूर, वांजरखेडा, कारसा-पोहरेगांव, खुलगापूर, डोंगरगाव, धनेगाव येथे सहा बंधारे व तावरजा नदीवर भूसणी येथे एक असे एकुण सात बंधा-यांसाठी एकुण ७७.२३ दलघमी पाणी वापरण्याचे प्रस्तावित केले होते.

उच्चाधिकार समितीने प्रस्तावित केलेल्या पाण्याचे प्रत्यक्ष पाणीवापराचे फेरनियोजन करुन मांजरा नदीवर साई-महापूर, शिवणी, टाकळगाव-देवळा, होसून तालुका निलंगा तसेच लासरा तालुका कळंब येथे नवीन बॅरेजेस् प्रस्तावित करण्यात आले होते. मांजरा खो-यात अनियमित व अवेळी पडणारा पाऊस यामुळे कोल्हापूरी बंधा-यांमध्ये मनुष्यबळाने वाहत्या पाण्यामध्ये दरवाजे टाकण्याचे जिकिरीचे व अडचणीचे काम होते. कोल्हापूरी बंधा-यांमध्ये अपेक्षीत पाणीसाठा करता येत नव्हता. त्यामुळे परीसरात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते.
ही बाब लक्षात घेता कोल्हापूरी पद्धतीच्या बंधा-यांच्याद्वारांमध्ये नवीन तांत्रिक सुधारणा करुन बॅरेजेप्रमाणे उभ्या उचल पद्धतीचे विद्युत संचलीतद्वारे बसवून बॅरेजेमध्ये रुपांतर करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यास मंजूरी मिळाली आणि महाराष्ट्रात प्रथमच मांजरा नदीवरील बिंदगीहाळ, नागझरी, वांगदरी या तीन कोल्हापूरी बंधा-यांचे बॅरेजच्या धर्तीवर रुपांतर करण्यात आले. त्यामुळे बंधा-यांमध्ये पुर्ण क्षमतेने १०० टक्के पाणीसाठ्याची शाश्वत स्त्रोताची निर्मिती होऊन ९९३ हेक्टर सिंचन क्षेत्र पुर्नस्थापीत झाले आहे. त्याचा लाभ शेतक-यांना मिळत आहे.

बराजेसची शृंखला जलमय झाल्याने सिंचन क्षेत्रात सुमारे १२ हजार हेक्टरपेक्षा अधिक वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील मांजरा व निम्न तेरणा या दोन मोठ्या धरणांसह तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरु, देवर्जन, साकोळ, घरणी व मसलगा हे आठ मध्यम प्रकल्प व १३४ लघु प्रकल्प असे एकुण १४४ धरणात ६०.५८६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ८.६० टक्के पाणीसाठा आहे. या तुलनेत मांजरा नदीवरील १५, तेरणा नदीवरील ७ व तेरणा नदीवरील (समन्वय कार्यालये प्रकल्प) २ असे एकुण २७ बराजमध्ये ३५.०३५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४५.२ टक्के पाणीसाठा आहे. ज्या मांजरा नदीवर मांजरा धरण आहे त्या धरणात आजही ४४.८४३ दशलक्ष घनमीटर एवढा मृतपाणीसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी शुन्य आहे तर याच मांजरा नदीवरील १५ बराजमध्ये ३१.०१ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४७.८ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील धरण कोरडी तर नद्यांत पाणीच पाणी, अशी अवस्था केवळ बराजमुळे दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR