22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeलातूर३१ मार्चपूर्वी सर्व ऊसाचे गाळप करा

३१ मार्चपूर्वी सर्व ऊसाचे गाळप करा

लातूर : प्रतिनिधी
शेतकरी सभासदांच्या जिवनात आपल्या कार्यातून अमुलाग्र आर्थ­कि बदल घडवून आणत असलेल्या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अलाईड इंडस्ट्रीजने  २०२३-२०२४ मध्ये विद्यमान गळीत हंगामात केवळ ८८ दिवसात ४ लाख ९ हजार मे. टनाचे ऊसाचे गाळप करुन सक्षम नियोजनाचा एक आदर्श घालून दिला असून विद्यमान गळीत हंगाम मार्च ३१ पूर्वी ऊसाचे गाळप व्हावे, अशा सूचना जागृती शुगरचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी कारखाना प्रशासनास दिल्या आहेत
जागृती शुगरचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख  यांच्या मार्गदर्शनाखाली  नियोजनानुसार २० जानेवारी २०२३ अखेर कारखान्याकडे गाळपास आलेल्या ऊसाला ऊसबिला पोटी प्रति मेट्रीक टन २५०० रुपये याप्रमाणे पहिला हप्ता दिला असुन  यासोबत ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांचे पेमेंट ठरलेल्या कालावधीत नियमीतपणे अदा केले जात आहेत.  जागृती साखर कारखान्याने विद्यमान गळीत हंगामात ८ लाख ३६ हजार १०० (५० कि.) इतके पोते साखर उत्पादन केले आहे. ३५ लाख ३३ हजार ४५३ लिटर इतके  इथेनॉल निर्मिती केली आहे. तसेच १ कोटी ३८ लाख ३७ हजार  युनिट इतकी वीज वितरीत केली आहे. दि. ३१ जानेवारी २०२४ अखेर सरासरी ११.०१ एवढा साखर उतारा जागृती कारखान्यास प्राप्त झाला आहे.
विद्यमान गळीत हंगामात शेतकरी सभासदांचे ऊसाचे गाळप तत्परतेने व्हावे या हेतूने प्रति दिन २५०० एवढी गाळप क्षमतेवरुन ५००० मे.टन दैनंदिन गाळप क्षमता साखर कारखान्याने केली आहे. त्यामुळे या भागातील अतिरीक्त्त ऊस जागृती साखर कारखाना मार्चपर्यंत सुरु ठेवणार असून गाळपाचे नियोजन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुखह्याांच्या मार्गदर्शनाखाली  केले आहे असून जागृती शुगरने नेहमीच बदलत्या आधुनिक परिस्थ­तिीत काळाची गरज ओळखुन पावले उचलली आहेत. उपपदार्थ निर्मितीतून अधिकचा ऊसदर शेतक-यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR