24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयरिक्षा-बस अपघातात ५ ठार

रिक्षा-बस अपघातात ५ ठार

मल्लापूरम : केरळच्या मल्लापूरम येथे एका भीषण दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रवाशांनी भरलेली ऑटो रिक्षा आणि बसमध्ये जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. सबरीमाला येथून दर्शन करुन येत असताना मल्लापूरम येथे भाविकांच्या ऑटो रिक्षाला धडक बसल्याची प्राथमिक माहिती आहे. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, पोलिसांशी संपर्क साधला.

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. मल्लापूरम पोलिसांकडून घटनेचा तपास करण्यात येत असून आरटीओ कार्यालयाचीही मदत घेतली जात आहे. येथील रस्ता खराब असल्यानेच हा अपघात झाल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे. दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ४ जणांसह एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सबीरा, मोहम्मद निशाद, आशा फातिमा, मोहम्मद आसन आणि रेहान यांचा समावेश आहे. तर, दुर्घटनेतील जखमींना कोझिकोड येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR