24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयस्वप्ने पूर्ण करण्यासाठी आमची वचनबद्धता अटल : पंतप्रधान

स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आमची वचनबद्धता अटल : पंतप्रधान

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णायाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. केंद्र सरकारचा जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय योग्य आणि वैध होता, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, न्यायालयाने आपल्या सखोल ज्ञानाने, आपण भारतीय या नात्याने इतर सर्व गोष्टींपेक्षा एकतेचे मर्म अधिक दृढ केले आहे. मी जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या लोकांना खात्री देऊ इच्छितो की तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आमची वचनबद्धता अटल आहे.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, कलम ३७० रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय ऐतिहासिक आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी भारतीय संसदेने घेतलेला निर्णय न्यायालयाने घटनात्मकदृष्ट्या कायम ठेवला आहे. जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील आमच्या बहिणी आणि भावांसाठी आशा, प्रगती आणि एकतेची ही एक अद्भुत घोषणा आहे. आजचा निर्णय हा केवळ कायदेशीर निर्णय नाही तर तो आशेचा किरण आहे, उज्ज्वल भविष्याचे वचन आहे आणि एक मजबूत, अधिक अखंड भारत निर्माण करण्याच्या आमच्या सामूहिक संकल्पाचा दाखला आहे.

निर्णय पूर्णपणे घटनात्मक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. ५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० रद्द करण्याचा दूरदर्शी निर्णय घेतला. तेव्हापासून जम्मू-काश्मीरमध्ये शांतता आणि सामान्यता पूर्ववत झाली आहे. हिंसाचारग्रस्त खोऱ्यातील मानवी जीवनाला विकासाने नवा अर्थ दिला आहे. पर्यटन आणि कृषी क्षेत्राच्या समृद्धीमुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील रहिवाशांच्या उत्पन्नाच्या पातळीत वाढ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने हे सिद्ध झाले आहे की कलम ३७० हटवण्याचा निर्णय पूर्णपणे घटनात्मक होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR