24 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeमहाराष्ट्रफडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली

फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली

पुणे : ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीपदाची जबाबदारी संभाळण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. ते गृहमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे’,अशी टीका बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सातत्याने बदल्या करण्यात येत आहेत. त्यांना पारदर्शकपणे काम करु दिले जात नाही.

गेल्या १५ दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गुन्हेविषयक नवे विधेयक मांडले आहे. ज्यामध्ये फोन टॅपिंग अधिकृत करण्यात आलीये. गृहमंत्रालय पूर्णपणे अपयशी ठरलंय, असा दावाही सुळे यांनी केला. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या,गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि देशाच्या समाजकारणात आंबेडकर कुटुंबीयांनी मोठं योगदान दिलंय. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही चांगल्या पद्धतीने काम केलंय. संविधान आणि देश वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांची गरज आहे. नव्या पिढीला त्यांनी मार्गदर्शन करावे. इंडिया आघाडीतही त्यांचा मोठा रोल असणार आहे, असा मला विश्वास आहे. संविधानासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला
लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे.फक्त त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. अनेक महिन्यांपूर्वीचे हा फॉर्म्युला दिल्लीत ठरला होता. लवकरच महाविकास आघाडी जागावाटपाबाबत निर्णय घेईल, असेही सुळे यांनी स्पष्ट केले. मी लहान कार्यकर्ती आहे. सध्या तरी जनतेची सेवा आणि लोकसभेतील सहभाग यावरच माझा सहभाग आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महाराष्ट्रातील प्रकल्प दुस-या राज्यात
महाराष्ट्रातील प्रकल्प दुस-या राज्यात नेले जात आहेत. गुंतवणूक होत नाहीये. हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. यावर महाराष्ट्रातील ट्रीपल इंजिन सरकार गप्प आहे. खोके सरकारकडे २०० आमदार असूनही महाराष्ट्रावर होणा-या अन्यायावर कोणीही बोलत नाही,अशी टीका सुळे यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR