25 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रशेतक-यांनो माझं काय चुकलं!

शेतक-यांनो माझं काय चुकलं!

नगर : प्रतिनिधी
या निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली होती. या मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे नेते धैर्यशील माने विजयी झाले आहेत. दरम्यान पराभवानंतर राजू शेट्टींनी एक भावनिक पोस्ट करत माझं काय चुकलं! शेतक-यांनो तुम्हीही… अशा स्वरूपाची पोस्ट केली आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची यावेळी जोरदार चर्चा झाली होती. या मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकांचे सर्व निकाल हाती आले आहेत. काल रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी मतमोजणी सुरू होती. यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी बाजी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महायुतीला जोरदार फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत चुरशीची मानली जात होती. या मतदारसंघात तिरंगी लढत होती. धैर्यशील माने, सत्यजीत पाटील आणि राजू शेट्टी असा सामना होता. यामध्ये धैर्यशील माने आणि सत्यजीत पाटील यांच्यात काँटे की टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, शेतक-यांचे प्रश्न घेऊन लढणारे राजू शेट्टी यांना क्रमांक तीनची मते मिळाली. त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यानंतर राजू शेट्टींनी एक भावनिक पोस्ट केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR